शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

पालखी सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: June 17, 2017 03:31 IST

पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाल्हे : पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेले वीर धरण कोरडे पडले आहे. धरणामध्ये अवघा ०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. माऊली पालखी सोहळा व संत सोपानकाका पालखी सोहळा याच्याबरोबरचा समाज वाढत आहे. पालखी सोहळा २३ जूनला वाल्हे येथेयेणार आहे. येथून पुढे नीरापासून पंढरपूरपर्यंत पालखी सोहळ्याला पाणी सोडावे लागते. सोहळा वाल्हे तेथून पुढे नीरा येथे माऊलींच्या पादुकांना नीरा नदीवर पवित्र स्नान घातले जाते. लाखो वारकरीही यामध्ये स्नान करतात. मात्र धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे दोन्ही पालखी सोहळ्याला पाणी मुबलक मिळणार नाही. गतवर्षी धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर ही चारही धरणे शंभर टक्के भरली होती. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धरणातील पाणीसाठा पूर्ण कमी झाला आहे. तुटपुंज्या पाण्यावर सोहळा पार पाडावा लागणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. तो सगळा गढूळ पाणीसाठा असल्यामुळे ते पाणी खाली सोडले तरी वारकरी व भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो.- अद्याप पावसाने या परिसरात हजेरी लावली नाही. जून, जुलैमध्ये पाऊस पडला नाही तर या क्षेत्रातील लाभधारकांनाही मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागेल. पालखी सोहळ्यासाठी आम्ही भाटघर व नीरा देवधर याही धरणांतील पाणी वापरणार आहे. सोहळ्याला पाणीपुरवठा कमी पडून देणार नसल्याचे वीर धरण शाखा अभियंता व्ही. बी. मंत्री यांनी सांगितले.