शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पाण्यासाठी टँकरवारी

By admin | Updated: April 16, 2017 01:27 IST

पारा चढू लागताच शहरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील बाह्य भागात तर स्थिती चिंताजनक बनली आहे.

४०० हून अधिक टँकरने शहरात होतोय पाणीपुरवठा : आऊटरमध्ये नागरिक त्रस्तराजीव सिंह नागपूरपारा चढू लागताच शहरात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. शहरातील बाह्य भागात तर स्थिती चिंताजनक बनली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना आता पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून टँकरमुक्तीचा दावा करणाऱ्या महापालिकेचा दावा फोल ठरताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी टँकरची मागणी वाढली असून, फेऱ्याही वाढल्या आहेत. जलवाहिनी असलेल्या व नसलेल्या भागात सध्या ४०० हून अधिक टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. असे असले तरी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना कारावा लागत आहे. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नॉन नेटवर्क भागात २७८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या उन्हाळ्यात नॉन नेटवर्क असलेल्या भागात २२० ते २३५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. याशिवाय नेटवर्क असलेल्या भागात ९० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. याशिवाय गेल्या वर्षी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळामध्ये ७६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून हे सिद्ध होते की, टँकरने पाणीपुरवठा बंद करणे तूर्तास शक्य नाही. शहरातील प्रत्येक भागात जलवाहिनी टाकली जात नाही व त्याद्वारे पाणीपुरवठा होत नाही तोवर टँकर बंद करणे शक्य नाही. टँकरच्या वाढलेल्या फेऱ्यांबाबत विचारणा केली असता जलप्रदाय विभागाचे म्हणणे आहे की, पूर्वी एका टँकरद्वारे १० फेऱ्या केल्या जात होत्या, आता फक्त सात फेऱ्यांची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढलेली दिसत आहे. उन्हाळा तापू लागताच शहराच्या बाह्य भागात टँकरची मागणी वाढली आहे. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्यात आल्याचेही विभागाचे म्हणणे आहे. शहरातील पाणी टंचाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षाने महापौरांच्या कक्षात मडके फोडले. धरणे दिले. घोषणाबाजी केली. तर सत्तापक्षातील काही नगरसेवकांनी शहरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. (प्रतिनिधी)पाण्याचे पैसे वसूलणे कठीणज्या भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे तेथे फक्त पाण्याचे पैसे वसूल करा, असा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत पारित करण्यात आला आहे. विरोधकांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. या मुद्यावर पुढे संघर्ष करण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तरी टँकरने दिल्या जाणाऱ्या पाण्याचे पैसे वसूल करण्याची चिन्हे कमीच आहेत. पाणी टंचाई नाही : द्रवेकरपाणीपुरवठा कंपनी ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी सांगितले की सद्यस्थितीत शहरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात दररोज सुमारे ७१० दलघमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात पाणी समस्या नाही. नवेगांव खैरी व तोतलाडोह जलाशयात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध असल्याचे सिंचन विभागाने कळविले आहे, असेही त्यांनी सांगितले.