शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

‘जलयुक्त शिवार एक चळवळ व्हावी’

By admin | Updated: October 16, 2015 01:13 IST

दुष्काळी परिस्थितीवर जर मात करायची असेल, तर जिरायती भागातील प्रत्येक गावात जलसंधारणाची भरीव कामे होणे गरजेचे असुन गावातील वाहून जाणारे पाणी गावातच अडविल्यास पाणीटंचाईचे निवारण होणे शक्य होईल

वासुंदे : दुष्काळी परिस्थितीवर जर मात करायची असेल, तर जिरायती भागातील प्रत्येक गावात जलसंधारणाची भरीव कामे होणे गरजेचे असुन गावातील वाहून जाणारे पाणी गावातच अडविल्यास पाणीटंचाईचे निवारण होणे शक्य होईल. यासाठी शासनाने सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान ही एक चळवळ होणे गरजेचे आहे, असे मत कुसेगावचे सरपंच मनोज फडतरे यांनी बंधाऱ्याच्या पाणीपूजनाप्रसंगी व्यक्त केले.कुसेगाव हे दौंड तालुक्याच्या जिरायत भागामध्ये येणारे गाव असून, आजही या गावाच्या परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी गावाच्या काही भागामध्ये मध्यम पाऊस होऊन त्या परिसरातील ओढ्यावर असलेले बंधारे या पावसाच्या पाण्याने भरले. त्यामुळे या बंधाऱ्यालगतच्या विहिरींच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल. बऱ्याच दिवसांनी बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा झाल्याने या बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन सरपंच मनोज फडतरे व ग्रामस्थांनी केले. दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दादासाहेब शितोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रमेश भोसले, दादा सोनवणे, अंकुश भोसले, मधुकर शितोळे, सुरेश भोसले, संपत भोसले, राजेंद्र भोसले, दिलीप शितोळे, सोमनाथ भोसले, मानसिंग शितोळे, प्रल्हाद भोसले, शिवाजी शितोळे, दत्तात्रय भोसले, अंकुश भोसले, संदीप भोसले, प्रकाश लोणकर या वेळी उपस्थित होते.