शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

‘जलयुक्त शिवार एक चळवळ व्हावी’

By admin | Updated: October 16, 2015 01:13 IST

दुष्काळी परिस्थितीवर जर मात करायची असेल, तर जिरायती भागातील प्रत्येक गावात जलसंधारणाची भरीव कामे होणे गरजेचे असुन गावातील वाहून जाणारे पाणी गावातच अडविल्यास पाणीटंचाईचे निवारण होणे शक्य होईल

वासुंदे : दुष्काळी परिस्थितीवर जर मात करायची असेल, तर जिरायती भागातील प्रत्येक गावात जलसंधारणाची भरीव कामे होणे गरजेचे असुन गावातील वाहून जाणारे पाणी गावातच अडविल्यास पाणीटंचाईचे निवारण होणे शक्य होईल. यासाठी शासनाने सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान ही एक चळवळ होणे गरजेचे आहे, असे मत कुसेगावचे सरपंच मनोज फडतरे यांनी बंधाऱ्याच्या पाणीपूजनाप्रसंगी व्यक्त केले.कुसेगाव हे दौंड तालुक्याच्या जिरायत भागामध्ये येणारे गाव असून, आजही या गावाच्या परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी गावाच्या काही भागामध्ये मध्यम पाऊस होऊन त्या परिसरातील ओढ्यावर असलेले बंधारे या पावसाच्या पाण्याने भरले. त्यामुळे या बंधाऱ्यालगतच्या विहिरींच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल. बऱ्याच दिवसांनी बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा झाल्याने या बंधाऱ्यातील पाण्याचे पूजन सरपंच मनोज फडतरे व ग्रामस्थांनी केले. दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दादासाहेब शितोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रमेश भोसले, दादा सोनवणे, अंकुश भोसले, मधुकर शितोळे, सुरेश भोसले, संपत भोसले, राजेंद्र भोसले, दिलीप शितोळे, सोमनाथ भोसले, मानसिंग शितोळे, प्रल्हाद भोसले, शिवाजी शितोळे, दत्तात्रय भोसले, अंकुश भोसले, संदीप भोसले, प्रकाश लोणकर या वेळी उपस्थित होते.