शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पुण्याला आठ महिने पुरेल इतका पाणीसाठा

By admin | Updated: July 26, 2015 00:35 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील धरणांमधील पाणीसाठा १०.७२ टीएमसी झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील धरणांमधील पाणीसाठा १०.७२ टीएमसी झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणसाठयातील वाढ सुरूच असून धरणामधील हे पाणी पुणे शहरास पुढील सात ते आठ महिने पुरेल एवढे असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, आज दिवसभरात खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तसेच या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची वाढ सुरूच असल्याचेही सांगण्यात आले. जून महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यभरात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने या धरणसाखळीतील धरणांमध्येही चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे ३ टीएमसीपर्यंत खाली आलेला पाणीसाठा या पावसाने सात टीएमसी पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र, २० जुलैपासून पुन्हा पावसाने दमदार पुनरागमन केले असून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. तर धरणांच्या परिसरात संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढ्या-नाल्यांमधून धरणात पाणी येते आहे. (प्रतिनिधी)शहरासाठी आठ महिन्यांचा साठा - शहराला दररोज सुमारे १२५० एलएलडी पाण्याची गरज आहे. त्यानुसार, पालिकेस दर महिन्यास जवळपास सव्वा टीएमसी पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे जर पावसाने पुन्हा ओढ दिल्यास आणि हे सर्व पाणी शहरासाठी राखीव ठेवल्यास हे पाणी महापालिकेस आठ महिने पुरेल एवढे आहे. तर या पाणीसाठयात आणखी वाढ होत आहे. पाच दिवसांत ७७५ मिमी पाऊस - या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २० ते २५ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीत तब्बल ७७५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यात सर्वाधिक २६१ मिलिमीटर टेमघर, २१७ मिमी पानशेत, २१८ मिमी वरसगाव, तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे ४२ मिमी पाऊस झाला आहे. तर गेल्या चोवीस तासांत या चारही धरणांंमध्ये सुमारे १८० मिमी पावसाची नोंद झाली.