शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

पाणीटंचाईच्या श्रावणातही झळा!

By admin | Updated: August 27, 2015 04:48 IST

भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ह्यात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे

पुणे : भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ह्यात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे व १५९ वाड्यावस्तांवर ५६ हजार ८९१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला टँकर कमी होऊन १९ वर गेले होते. ती संख्या आता २९ झाली आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पुन्हा १0 टँकर वाढले आहेत. यावरून पाणीटंचाई किती गंभीर होत आहे हे दिसून येते. शिरूर, दौैंड, इंदापूर व बारामती या तालुक्यांत २५ जूननंतर अद्याप पाऊसच पडला नाही. परिणामी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. बारामती तालुक्यात सर्वाधिक १0 टँकरने ४ गावे व ७६ वाड्यावस्त्यांवर २१ हजार २६ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. हे टँकर गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यात टँकर गेल्या आठवडाभरात वाढले असून, बारामतीपाठोपाठ ९ टँकरने ५ गावे व १९ वाड्यावस्तांवर १५ हजार २६६ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. पुरंदर तालुक्यात ५ टँकरने १ गाव ५१ वाड्यावस्तांवर १0 हजार ७११ लोकसंख्येला टँकर पाणी पुरवत आहेत. आंबेगाव तालुक्यात २ तर दौैंड, हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यात प्रत्येकी १ टँकर सुरू आहे. (प्रतिनिधी)टँकरची मागणी करून टँकर मिळत नसल्याची जिल्ह्यात ओरड आहे. जर मागणीप्रमाणे टँकर मिळाले असते तर पाणीटंचाई किती गंभीर आहे, हे समोर आले असते. जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव द्या चार तासांत मंजूर करू, असे नुकतेच आश्वासन दिले आहे. त्यानुसार पावसाची स्थिती अशीच राहिली तर टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची शक्यता आहे.