शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

पाईट परिसरात पाणीटंचाई

By admin | Updated: June 20, 2016 01:03 IST

तालुक्याच्या पश्चिम भागातील विराम, भलवडी येथील गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची कायमस्वरूपी योजना नसल्याने रात्रभर जागून त्यांना

पाईट : तालुक्याच्या पश्चिम भागातील विराम, भलवडी येथील गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची कायमस्वरूपी योजना नसल्याने रात्रभर जागून त्यांना येथील स्मशानभूमीतूनपाणी आणण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या अतिदुर्गम डोंगराळ पश्चिम भगातील विराम, भलवडी व तांबडेवाडी या संयुक्त ग्रामपंचायतीच्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाण्याची कुठली योजना नाही. यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पावसाची तीव्रता जास्त असल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण होते. यामुळे स्मशानभूमीतील हातपंपावरून पाणी आणावे लागते.येथील पाणीटंचाईस काही अंशी निसर्गाचा तर काही अंशी तालुक्यातील पदाधिकारी जबाबदार आहेत. उन्हाळ्यात या गावांची टँकरची मागणी असूनही त्यांना टँकर मिळाला नाही. या परिसरातील नागरिकांची पाण्याची होणारी परवड लक्षात घेता विराम गावच्या उत्तरेला २०१३ ला ४६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला; परंतु या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले. पावसामुळे हा बंधारा वाहून गेला. यामुळे येथील जवळपास १२ ते १३ विहिरी गाडल्या गेल्या. बंधाराही गेला आणि गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही गाडल्या गेल्या. यामुळे पााण्याची सोय तर सोडाच, पण गैरसोय मात्र झाली. यावर गेल्या दोन वर्षांत कोणी काही बोलायला तयार नाही. हेही एक कारण टंचाईस आहे. दुसरे कारण गावापासून २ किमी अंतरावर विहीर आहे. त्या ठिकाणाहून विराम आणि गावास १२ लाख २० हजारांची व भलवडी गावास ९ लाख ४० हजारांची नळ-पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. परंतु, ग्रामपंचायत ठेकेदार असलेली नळ-पाणीपुरवठा योजना जुने पाइप बसवून पूर्ण केली. लोकवर्गणी भरूनही निकृष्ट काम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विराम, भलवडी या परिसरामध्ये ३ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्याचे गेल्या २ वर्षांपूर्वी ढापे चोरीस गेले आहेत. यामुळे या बंधाऱ्यांमध्ये एक थेंबही पाणी गेल्या २ वर्षांपासून साठलेले नाही. येथील स्मशानभूमीमध्ये दीड महिन्यापूर्वी अंत्यविधीसाठी दोन्ही गावच्या मध्यावर असलेल्या स्मशानभूमीवर एक हातपंप घेतला आहे. तोच सध्या या दोन्ही गावची तहान भागवत आहे. मात्र, येथील महिला-पुरुषांना व लहान-लहान मुलांना रात्रभर जागून स्मशानभूमीवर पाणी भरावे लागत आहे.