शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

पाईट परिसरात पाणीटंचाई

By admin | Updated: June 20, 2016 01:03 IST

तालुक्याच्या पश्चिम भागातील विराम, भलवडी येथील गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची कायमस्वरूपी योजना नसल्याने रात्रभर जागून त्यांना

पाईट : तालुक्याच्या पश्चिम भागातील विराम, भलवडी येथील गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची कायमस्वरूपी योजना नसल्याने रात्रभर जागून त्यांना येथील स्मशानभूमीतूनपाणी आणण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या अतिदुर्गम डोंगराळ पश्चिम भगातील विराम, भलवडी व तांबडेवाडी या संयुक्त ग्रामपंचायतीच्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाण्याची कुठली योजना नाही. यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पावसाची तीव्रता जास्त असल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण होते. यामुळे स्मशानभूमीतील हातपंपावरून पाणी आणावे लागते.येथील पाणीटंचाईस काही अंशी निसर्गाचा तर काही अंशी तालुक्यातील पदाधिकारी जबाबदार आहेत. उन्हाळ्यात या गावांची टँकरची मागणी असूनही त्यांना टँकर मिळाला नाही. या परिसरातील नागरिकांची पाण्याची होणारी परवड लक्षात घेता विराम गावच्या उत्तरेला २०१३ ला ४६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला; परंतु या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले. पावसामुळे हा बंधारा वाहून गेला. यामुळे येथील जवळपास १२ ते १३ विहिरी गाडल्या गेल्या. बंधाराही गेला आणि गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही गाडल्या गेल्या. यामुळे पााण्याची सोय तर सोडाच, पण गैरसोय मात्र झाली. यावर गेल्या दोन वर्षांत कोणी काही बोलायला तयार नाही. हेही एक कारण टंचाईस आहे. दुसरे कारण गावापासून २ किमी अंतरावर विहीर आहे. त्या ठिकाणाहून विराम आणि गावास १२ लाख २० हजारांची व भलवडी गावास ९ लाख ४० हजारांची नळ-पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. परंतु, ग्रामपंचायत ठेकेदार असलेली नळ-पाणीपुरवठा योजना जुने पाइप बसवून पूर्ण केली. लोकवर्गणी भरूनही निकृष्ट काम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विराम, भलवडी या परिसरामध्ये ३ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्याचे गेल्या २ वर्षांपूर्वी ढापे चोरीस गेले आहेत. यामुळे या बंधाऱ्यांमध्ये एक थेंबही पाणी गेल्या २ वर्षांपासून साठलेले नाही. येथील स्मशानभूमीमध्ये दीड महिन्यापूर्वी अंत्यविधीसाठी दोन्ही गावच्या मध्यावर असलेल्या स्मशानभूमीवर एक हातपंप घेतला आहे. तोच सध्या या दोन्ही गावची तहान भागवत आहे. मात्र, येथील महिला-पुरुषांना व लहान-लहान मुलांना रात्रभर जागून स्मशानभूमीवर पाणी भरावे लागत आहे.