शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

यवत परिसरत पाण्याची टंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:15 IST

---- यवत : यवत परिसरात यंदाच्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर व उन्हाळ्याची चाहूल अद्याप लागली नसतानाही पाणीटंचाई निर्माण झाली ...

----

यवत : यवत परिसरात यंदाच्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर व उन्हाळ्याची चाहूल अद्याप लागली नसतानाही पाणीटंचाई निर्माण झाली असून बहुतांश विहिरींची पाणी पातळी कमालीची खालावली आहे.

यवत गावात नागरिकांना पाणीपुरवठा करणारे पाण्याचे स्राेत खालावल्याने पाणी पुरवठा करतांना ग्रामपंचायत यंत्रणेची तारांबळ उडत आहे.

फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा कसा बसा गेला आहे. अजून तर उन्हाळा सुरू होणे बाकी आहे. असे असताना गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने सगळेच चक्रावून गेले आहेत. यंदा विक्रमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र पाण्याचा भरमसाठ वाढलेला वापर, अमर्याद कूपनलिका यामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याचा प्रत्यय यंदा आला आहे.

नवीन मुठा उजवा कालवा व जुना कालवा दोन्ही सध्या बंद असल्याने परिसरातील शेतीला देखील पाणी कमी पडू लागले आहे. आणखी काही दिवस नवीन मुठा कालव्यातून आवर्तन सुरू न झाल्यास तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

सद्य परिस्थितीत यवत गावात एक दिवसाआड नळाला पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु दिवसेंदिवस गावात पाणीपुरवठा करणारे स्रोत आटत चालल्याने पाणी टंचाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे गावातील ग्रामपंचायत निवडणूक होऊन नवीन पदाधिकारी आलेले असताना गावात पहिल्याच आठवड्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने त्यांची डोके दुःखी वाढणार आहे.

गावाला पाणीपुरवठा करताना महत्त्वाची असलेली माटोबा तलाव येथील विहिरीला पाणी प्रचंड कमी झाले आहे. ग्रामपंचायत मागे असलेला पाणी साठवण तलाव कोरडा ठाक पडला आहे. सद्य परिस्थितीत यवत स्टेशन येथील बाहेती विहीर, जुन्या तलाठी कार्यालय नजीक व गांधी हॉस्पिटल लगत असलेला बोअरवेल सुरू असून संपूर्ण गावाला केवळ एवढ्या पाणी स्रोतांमधून पाणी पुरवणे जिकिरीचे ठरत आहे.

--

चौकट :

यवतच्या शहरीकरणाचा दुष्परिणाम

यवत व परिसरात शहरीकरण होत आहे. यवतसह आजूबाजूची सर्व गावे पीएमआरडीएमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. भविष्यात वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील पाण्याच्या शाश्वत योजनेचा विचार आताच प्रशासनाने करणे गरजेचे आहे. अन्यथा नवीन मुठा कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर सर्वच गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई कायम जाणवू शकते.

--

फोटो क्रमांक :

फोटो ओळ :- खडकवासला धरण साखळीत मुबलक पाणीसाठा असताना देखील कोरडा पडलेला नवीन मुठा उजवा कालवा.