शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

यवत परिसरत पाण्याची टंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:15 IST

---- यवत : यवत परिसरात यंदाच्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर व उन्हाळ्याची चाहूल अद्याप लागली नसतानाही पाणीटंचाई निर्माण झाली ...

----

यवत : यवत परिसरात यंदाच्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर व उन्हाळ्याची चाहूल अद्याप लागली नसतानाही पाणीटंचाई निर्माण झाली असून बहुतांश विहिरींची पाणी पातळी कमालीची खालावली आहे.

यवत गावात नागरिकांना पाणीपुरवठा करणारे पाण्याचे स्राेत खालावल्याने पाणी पुरवठा करतांना ग्रामपंचायत यंत्रणेची तारांबळ उडत आहे.

फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा कसा बसा गेला आहे. अजून तर उन्हाळा सुरू होणे बाकी आहे. असे असताना गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने सगळेच चक्रावून गेले आहेत. यंदा विक्रमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र पाण्याचा भरमसाठ वाढलेला वापर, अमर्याद कूपनलिका यामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याचा प्रत्यय यंदा आला आहे.

नवीन मुठा उजवा कालवा व जुना कालवा दोन्ही सध्या बंद असल्याने परिसरातील शेतीला देखील पाणी कमी पडू लागले आहे. आणखी काही दिवस नवीन मुठा कालव्यातून आवर्तन सुरू न झाल्यास तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

सद्य परिस्थितीत यवत गावात एक दिवसाआड नळाला पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु दिवसेंदिवस गावात पाणीपुरवठा करणारे स्रोत आटत चालल्याने पाणी टंचाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे गावातील ग्रामपंचायत निवडणूक होऊन नवीन पदाधिकारी आलेले असताना गावात पहिल्याच आठवड्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने त्यांची डोके दुःखी वाढणार आहे.

गावाला पाणीपुरवठा करताना महत्त्वाची असलेली माटोबा तलाव येथील विहिरीला पाणी प्रचंड कमी झाले आहे. ग्रामपंचायत मागे असलेला पाणी साठवण तलाव कोरडा ठाक पडला आहे. सद्य परिस्थितीत यवत स्टेशन येथील बाहेती विहीर, जुन्या तलाठी कार्यालय नजीक व गांधी हॉस्पिटल लगत असलेला बोअरवेल सुरू असून संपूर्ण गावाला केवळ एवढ्या पाणी स्रोतांमधून पाणी पुरवणे जिकिरीचे ठरत आहे.

--

चौकट :

यवतच्या शहरीकरणाचा दुष्परिणाम

यवत व परिसरात शहरीकरण होत आहे. यवतसह आजूबाजूची सर्व गावे पीएमआरडीएमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. भविष्यात वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील पाण्याच्या शाश्वत योजनेचा विचार आताच प्रशासनाने करणे गरजेचे आहे. अन्यथा नवीन मुठा कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर सर्वच गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई कायम जाणवू शकते.

--

फोटो क्रमांक :

फोटो ओळ :- खडकवासला धरण साखळीत मुबलक पाणीसाठा असताना देखील कोरडा पडलेला नवीन मुठा उजवा कालवा.