शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगावच्या आदिवासी भागात पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:18 IST

डोंगरमाथ्यावरील पाणवठे आटले आहेत. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांत वाढ, पशुपक्ष्यांनाही घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. डोंगरमाथ्यावरील दुर्गम आदिवासी ...

डोंगरमाथ्यावरील पाणवठे आटले आहेत. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांत वाढ, पशुपक्ष्यांनाही घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. डोंगरमाथ्यावरील दुर्गम आदिवासी गावे व वाड्या-वस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहेत. माणसांबरोबरच पशू- पक्ष्यांनाही घोटभर पाण्यासाठी वणण करावी लागत आहे.

माथ्यावर रणरणते उन, तर पायाखालचा फुफाटा तुडवत बाया-बापड्यांचे हंडाभर पाण्यासाठी जंगलातील झऱ्यांवर हेलपाटे सुरू झाले आहेत. दूषित पाण्यामुळे आदिवासी भागात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे, तर

पाणीटंचाईच्या समस्येबरोबरच आदिवासी भागात आरोग्याच्या समस्यांचाही नागरिकांना सामना करावा लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. यामुळे पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. विशेष करून तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगर माथ्यावरील गावे व वाड्यावस्त्या तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक पाणवठे आटल्याने माणसांबरोबरच पशुपक्षी व जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळे, विहिरी, पाणवठ्यांत जेमतेम शिल्लक असणारे पाणी दूषित झाले असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही अजून एक समस्या निर्माण झाली आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या तसेच बॅक्टेरियांमुळे आजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाटण खोऱ्यातील कुशिरे, महाळुंगे, दिगद, पिंपरी या गावांच्या आदिवासी वाड्यावस्त्या तर बोरघरच्या डोंगरावरील वाड्यावस्त्या, तिरपाड, कोंढरे, पिंपरगणे, नानवडे, न्हावेड, भोईरवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जेमतेम शिल्लक असणारे पाणीही दूषित होऊ लागले असून हेच पाणी पिऊन सध्या ग्रामस्थांना दिवस काढावे लागत आहेत. गोहे गावच्या डोंगरमाथ्यावरील उपळवाडी, सायरखळा, उभेवाडी, गाडेकरवाडी तसेच पोखरीची बेंढारवाडी या भागात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

एकंदरीतच यंदा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील नागरिकांबरोबरच पशुपक्षी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून महिनाभर बाकी आहे. टँकर सुरू करण्याचे नव्याने प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात पाणीटंचाई जाणवू लागली असून, हंडाभर पाण्यासाठी बायाबापड्यांची पायपीट

सुरू झाली आहे. पशुपक्ष्यांचे जीवही घोटभर पाण्यासाठी कसावीस होत आहेत.

छायाचित्र-कांताराम भवारी.