शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्हावरे परिसरात पाणीप्रश्न गंभीर

By admin | Updated: November 9, 2015 01:31 IST

शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळू लागली आहेत.

न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या समस्येलादेखील ग्रामस्थांना गंभीरपणे सामोरे जावे लागत आहे. तरी या परिसरात चासकमानचे आवर्तन त्वरित सोडण्यात यावे; अन्यथा सिंचन भवनाच्या दारात उपोषण करून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार अशोक पवार यांनी दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी शिरूर आणि खेड तालुक्यांसाठी चासकमानचे आवर्तन सोडताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘टेल टू हेड’ हा नियम डावलून चुकीच्या पद्धतीने ‘हेड टू टेल’ या पद्धतीने आवर्तन सोडले. परिणामी, न्हावरे परिसरातील न्हावरे, उरळगाव, आंधळगाव, आलेगाव पागा, निर्वी ही गावे चासकमानच्या आवर्तनापासून पूर्णपणे वंचित राहिली आहेत. तरी चासकमानच्या याअगोदरच्या आवर्तनापासून वंचित राहिलेल्या गावातील शेतकऱ्यांना प्राधान्याने प्रथम पाणी देण्यात यावे, अशी मागणी अशोक पवार यांनी केली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चासकमानचे आवर्तन हेड टू टेल या चुकीच्या नियमाने सोडण्याचा फटका शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांनाही बसला आहे. टेल टू हेड या पद्धतीने पाणी सोडल्यास कालव्यातील पाणी पाझरून त्याचा फायदा या भागातील भूजलपातळी उंचावण्यास होतो. दरम्यान, अशा स्वरूपाचा फायदा हेड टू टेल या चुकीच्या नियमाने आवर्तन सोडल्याने पश्चिम भागातील गावांना झालेला नाही.चासकमानचे आवर्तन टेल टू हेड सोडावे यासाठी न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांनी दोनदा रास्ता रोको करून आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनाची दखल संबंधित विभागाकडून घेतली गेली नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या गलथान कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. दरम्यान, अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयाचा फटका या भागातील ग्रामस्थ गेली वर्षभर सहन करत आहेत. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरील बाबींची गंभीर दखल घेऊन न्हावरे परिसरासाठी चासकमान आवर्तन त्वरित सोडावे; अन्यथा शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार अशोक पवार यांनी दिला आहे. (वार्ताहर)