शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

केंदूर व परिसरात पाणी प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST

हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच ...

हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती

केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच रोजच्या पाण्याचा प्रश्नही सध्या उद्भवत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप पावसाने पाठ फिरवलेली असून येथील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ जाणवू लागले आहे. थिटेवाडी बंधारा अद्यापही कोरडाच असून वेळ नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे रिकामे पडलेले आहे. त्यामुळे हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत.

केंदूप परिसरातील शेतात सोयाबीन, वाटाणा, मूग ही पिके असून त्यांची दाणे भरण्यात आलेल्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल. त्यामुळे ती पिके सुकत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पिकवाढीसाठी केलेला खर्च वाया जातो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यावर कांद्याची रोपे टाकावी का? पुढील काही दिवसात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होईल का, अशी चिंता शेतकऱ्यांना होऊ लागली आहे.

केंदूर व परिसरातील वाड्यावस्त्या पावसावरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडू लागले आहे. 'पाणीदार केंदूर'च्या माध्यमातून ओढा खोलीकरण, तलाव खोलीकरण, ओढ्यावरील बंधारे कामे करण्यासाठी आहेत मात्र पावसाने दिलेल्या ओढीमुळे सध्याचे चित्र भयावह वाटू लागले आहे. केंदूरला पाणी पुरवठा करणारी थिटेवाडी येथील विहीर पूर्णपणे कोरडी पडली असून सध्या चौफुला येथील पाइपलाइनद्वारे पाणी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये होणारा बिघाडामुळे चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे सरपंच सुवर्णा थिटे व उपसरपंच भरत साकोरे यांनी सांगितले.

--

आधीच दुष्काळ त्यात वीजमंडळाकडून अन्याय

कायमच दुष्काळी परिस्थितीत होरपळत असलेल्या केंदूरची परिस्थिती मागील वर्षी बरी होती मात्र यंदा भर पावसाळ्यातच पाणी प्रश्न भेडसावू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यातच वीज मंडळाने वीजजोडणी बंद करण्याचा धडाका सुरू केल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे थिटेवाडी बंधारा, वेळ नदीवरील बंधारे, वाड्या वस्तीवरील तलाव, अोढे भरून वाहण्यासाठी खूप मोठ्या पावसाची गरज या भागातील शेतकऱ्यांना आहे.

--

फोटो क्रमांक: केंदूर परिसरातील पाणी टंचाई

फोटो ओळ - केंदुर (ता. शिरूर) परिसरातील विहिरीची पाणी पातळी खालावल्यामुळे दुष्काळाची झळ जाणू लागलेली आहे.