शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केंदूर व परिसरात पाणी प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST

हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच ...

हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती

केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच रोजच्या पाण्याचा प्रश्नही सध्या उद्भवत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप पावसाने पाठ फिरवलेली असून येथील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ जाणवू लागले आहे. थिटेवाडी बंधारा अद्यापही कोरडाच असून वेळ नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे रिकामे पडलेले आहे. त्यामुळे हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत.

केंदूप परिसरातील शेतात सोयाबीन, वाटाणा, मूग ही पिके असून त्यांची दाणे भरण्यात आलेल्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल. त्यामुळे ती पिके सुकत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पिकवाढीसाठी केलेला खर्च वाया जातो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यावर कांद्याची रोपे टाकावी का? पुढील काही दिवसात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होईल का, अशी चिंता शेतकऱ्यांना होऊ लागली आहे.

केंदूर व परिसरातील वाड्यावस्त्या पावसावरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडू लागले आहे. 'पाणीदार केंदूर'च्या माध्यमातून ओढा खोलीकरण, तलाव खोलीकरण, ओढ्यावरील बंधारे कामे करण्यासाठी आहेत मात्र पावसाने दिलेल्या ओढीमुळे सध्याचे चित्र भयावह वाटू लागले आहे. केंदूरला पाणी पुरवठा करणारी थिटेवाडी येथील विहीर पूर्णपणे कोरडी पडली असून सध्या चौफुला येथील पाइपलाइनद्वारे पाणी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये होणारा बिघाडामुळे चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे सरपंच सुवर्णा थिटे व उपसरपंच भरत साकोरे यांनी सांगितले.

--

आधीच दुष्काळ त्यात वीजमंडळाकडून अन्याय

कायमच दुष्काळी परिस्थितीत होरपळत असलेल्या केंदूरची परिस्थिती मागील वर्षी बरी होती मात्र यंदा भर पावसाळ्यातच पाणी प्रश्न भेडसावू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यातच वीज मंडळाने वीजजोडणी बंद करण्याचा धडाका सुरू केल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे थिटेवाडी बंधारा, वेळ नदीवरील बंधारे, वाड्या वस्तीवरील तलाव, अोढे भरून वाहण्यासाठी खूप मोठ्या पावसाची गरज या भागातील शेतकऱ्यांना आहे.

--

फोटो क्रमांक: केंदूर परिसरातील पाणी टंचाई

फोटो ओळ - केंदुर (ता. शिरूर) परिसरातील विहिरीची पाणी पातळी खालावल्यामुळे दुष्काळाची झळ जाणू लागलेली आहे.