शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

केंदूर व परिसरात पाणी प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST

हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच ...

हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती

केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच रोजच्या पाण्याचा प्रश्नही सध्या उद्भवत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप पावसाने पाठ फिरवलेली असून येथील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ जाणवू लागले आहे. थिटेवाडी बंधारा अद्यापही कोरडाच असून वेळ नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे रिकामे पडलेले आहे. त्यामुळे हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत.

केंदूप परिसरातील शेतात सोयाबीन, वाटाणा, मूग ही पिके असून त्यांची दाणे भरण्यात आलेल्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल. त्यामुळे ती पिके सुकत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पिकवाढीसाठी केलेला खर्च वाया जातो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यावर कांद्याची रोपे टाकावी का? पुढील काही दिवसात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होईल का, अशी चिंता शेतकऱ्यांना होऊ लागली आहे.

केंदूर व परिसरातील वाड्यावस्त्या पावसावरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडू लागले आहे. 'पाणीदार केंदूर'च्या माध्यमातून ओढा खोलीकरण, तलाव खोलीकरण, ओढ्यावरील बंधारे कामे करण्यासाठी आहेत मात्र पावसाने दिलेल्या ओढीमुळे सध्याचे चित्र भयावह वाटू लागले आहे. केंदूरला पाणी पुरवठा करणारी थिटेवाडी येथील विहीर पूर्णपणे कोरडी पडली असून सध्या चौफुला येथील पाइपलाइनद्वारे पाणी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये होणारा बिघाडामुळे चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे सरपंच सुवर्णा थिटे व उपसरपंच भरत साकोरे यांनी सांगितले.

--

आधीच दुष्काळ त्यात वीजमंडळाकडून अन्याय

कायमच दुष्काळी परिस्थितीत होरपळत असलेल्या केंदूरची परिस्थिती मागील वर्षी बरी होती मात्र यंदा भर पावसाळ्यातच पाणी प्रश्न भेडसावू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यातच वीज मंडळाने वीजजोडणी बंद करण्याचा धडाका सुरू केल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे थिटेवाडी बंधारा, वेळ नदीवरील बंधारे, वाड्या वस्तीवरील तलाव, अोढे भरून वाहण्यासाठी खूप मोठ्या पावसाची गरज या भागातील शेतकऱ्यांना आहे.

--

फोटो क्रमांक: केंदूर परिसरातील पाणी टंचाई

फोटो ओळ - केंदुर (ता. शिरूर) परिसरातील विहिरीची पाणी पातळी खालावल्यामुळे दुष्काळाची झळ जाणू लागलेली आहे.