शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

केंदूर व परिसरात पाणी प्रश्न बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST

हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच ...

हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती

केंदूर : केंदूर व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील पाण्याची परिस्थिती खूप बिकट होत असून शेतीबरोबरच रोजच्या पाण्याचा प्रश्नही सध्या उद्भवत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप पावसाने पाठ फिरवलेली असून येथील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ जाणवू लागले आहे. थिटेवाडी बंधारा अद्यापही कोरडाच असून वेळ नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे रिकामे पडलेले आहे. त्यामुळे हाताला आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहेत.

केंदूप परिसरातील शेतात सोयाबीन, वाटाणा, मूग ही पिके असून त्यांची दाणे भरण्यात आलेल्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल. त्यामुळे ती पिके सुकत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पिकवाढीसाठी केलेला खर्च वाया जातो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे. थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यावर कांद्याची रोपे टाकावी का? पुढील काही दिवसात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होईल का, अशी चिंता शेतकऱ्यांना होऊ लागली आहे.

केंदूर व परिसरातील वाड्यावस्त्या पावसावरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडू लागले आहे. 'पाणीदार केंदूर'च्या माध्यमातून ओढा खोलीकरण, तलाव खोलीकरण, ओढ्यावरील बंधारे कामे करण्यासाठी आहेत मात्र पावसाने दिलेल्या ओढीमुळे सध्याचे चित्र भयावह वाटू लागले आहे. केंदूरला पाणी पुरवठा करणारी थिटेवाडी येथील विहीर पूर्णपणे कोरडी पडली असून सध्या चौफुला येथील पाइपलाइनद्वारे पाणी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये होणारा बिघाडामुळे चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे सरपंच सुवर्णा थिटे व उपसरपंच भरत साकोरे यांनी सांगितले.

--

आधीच दुष्काळ त्यात वीजमंडळाकडून अन्याय

कायमच दुष्काळी परिस्थितीत होरपळत असलेल्या केंदूरची परिस्थिती मागील वर्षी बरी होती मात्र यंदा भर पावसाळ्यातच पाणी प्रश्न भेडसावू लागल्याने चिंता वाढली आहे. त्यातच वीज मंडळाने वीजजोडणी बंद करण्याचा धडाका सुरू केल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे थिटेवाडी बंधारा, वेळ नदीवरील बंधारे, वाड्या वस्तीवरील तलाव, अोढे भरून वाहण्यासाठी खूप मोठ्या पावसाची गरज या भागातील शेतकऱ्यांना आहे.

--

फोटो क्रमांक: केंदूर परिसरातील पाणी टंचाई

फोटो ओळ - केंदुर (ता. शिरूर) परिसरातील विहिरीची पाणी पातळी खालावल्यामुळे दुष्काळाची झळ जाणू लागलेली आहे.