शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

निवडणूकीत पाणी योजना ठरणार कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST

उरुळी कांचन: गेल्या अकरा वर्षापासून उरुळी कांचनचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. कधी पाठपुरावा तर कधी तांत्रिक त्रुटींची पुर्ततेच्या ...

उरुळी कांचन: गेल्या अकरा वर्षापासून उरुळी कांचनचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. कधी पाठपुरावा तर कधी तांत्रिक त्रुटींची पुर्ततेच्या गर्तेत ही योजना अडकली. लोकप्रतिनींकडूनही होणारे दुर्लक्ष ही बाबही तितकीच महत्वाची आहे. नुकतीच ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात पाणी योजना कळीचा मुद्दा ठरणार आहे. सत्ताधारी असो वा विरोधक यांना पाणी प्रश्नाबाबत मतदारांना अपेक्षित असे उत्तर द्यावेच लागणार आहे. दरम्यान, गावातील वातावरण या योजनेमुळे चांगलेच तापले असल्याने ही योजना कोणाला तारक ठरणार हे येणारा काळच ठरवेल.

उरुळी कांचन शहरासाठी २००९ वर्षापासून विस्तारीत पाणी पुरवठा योजना साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आगामी २५ वर्षातील पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली. राज्य सरकारने राष्ट्रीय पेयजल योजनेतून उरुळी कांचन शहरासाठी सुमारे ७० कोटी रुपये अंदाजपत्रकाच्या विस्तारीत योजनेला काही बाबींच्या कागदपत्रांची पूर्तता कण्याच्या अटीवर आधारित तांत्रिक मंजुरी मिळाली. त्यानंतर २०१८ साली तत्कालीन आ. बाबुराव पाचर्णे यांच्या माध्यमातून मंत्रालयात काही बैठका होऊन तत्कालीन पाणी पुरवठा व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या योजनेला तांत्रिक मंजुरी दिली होती. पण उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाने काही त्रुटींची पुर्तता न केल्याने शासन दरबारी ही योजना प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत राहिली ती अजूनही तशीच आहे.

गेल्या अकरा वर्षापासून पाणी योजनेला ग्रहण लागले आहे. स्थानिक लोकप्रतीनिधींदेखील या योजनेच्या पाठपुरावा न केल्याने उरुळीकरांना वंचित रहावे लागले आहे. नुकतीच १५ जानेवारीला ग्रामपंचायच निवडणूकीचा धुरळा उडणार आहे. आतापासून अनेकांनी गुडघ्याला बांशिग बांधून आपण उमेवार आहे असे समजून प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु. या निवडणूकीत विकास कामांबरोबरच पाणी योजना कळीचा मुद्दा ठरणार आहे. या योजनेभवतीच संपूर्ण निवडणूक फिरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पाणी योजनेसंदभार्त कोणालाही अपेक्षीत असे उत्तर देता आले नाही. त्यामुळे नागरिकांनीही हाच मुद्दला उचलून प्रस्थापित आणि नवख्यांना सद्या तरी धोबीपिछाड केली आहे. निवडणूकीला महिन्याचा कालावधी असून नागरिकांची मनधरणी कोण कशा पद्धतीने करणार अन् कशाची बोळवण घालणार हे पाहणे मात्र, औत्सुक्याचे ठरणार आहे.

एक वर्षापूर्वी स्थापित झालेल्या महाविकास आघाडी सरकारने अर्थिक नियोजनाचा आढावा घेताना राज्यातील काही महत्वाचे प्रकल्प आणि पाणी पुरवठा योजनांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला, पण आता चाकणच्या पाणी पुरवठा योजनेला निधी मंजूर झाल्याने उरुळी कांचनचे नागरिक आपला हा प्रश्न कोण सोडवणार असा सवाल उपस्थित केला आहे. अद्यापर्यंत कोणीही याला उत्तर दिले नाही. त्यामुळे या प्रश्नावरुनच निवडणूकीतील उमेदवारांना कोडींत पकडण्याची रणनीति आखण्याचे काम सुरु असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघ, सजग नागरिक मंचच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी सांगितले.