शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी डाव्या कालव्याचे पाणी शिरूरला पोहोचले

By admin | Updated: May 5, 2016 04:19 IST

कुकडी प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी अखेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पोहोचले. मात्र, बंधारा पूर्ण भरला नाही. बंधारा पूर्ण भरल्यास दोन महिने पाणी पुरू शकणार आहे.

बारामती : परप्रांतीय मासेमारांना हाताशी धरून स्थानिक धनदांडगे उजनीतील मत्स्यबीजाची मोठ्याप्रमाणात शिकार करीत आहेत. परिणामी, माशांची संख्या घटत आहे. सध्या धरणाची पातळी वजा आहे. धरणाच्या अगदी पोटात झोपड्या टाकून परप्रांतीय मच्छीमार दिवसरात्र मत्स्यबीजाची शिकार करीत आहेत. यावर उजनी जलसंपदा विभाग व मत्स्यबीज विभाग मूग गिळून गप्प असल्याने स्थानिक मच्छीमार आश्चर्य व्यक्त करीत आहेत. उजनी जलाशयात २००२ सालापासून मत्स्यबीज सोडले गेले नाही. मागील १४ वर्षांपासून मत्स्यबीजच न सोडल्याने जलाशयात फक्त चिलापी जातीचाच मासा मोठ्याप्रमाणावर आहे. तत्कालीन आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर मत्स्यबीज विभाग काँग्रेस पक्षाकडे होते. उजनी जलाशयातील मासेमारीच्या ठेक्यावरून स्थानिक कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची तेव्हा आपापसांत जुंपली होती. या वादावर तोडगा न निघाल्याने १५ वर्षांपासून उजनीत मत्स्यबीजच सोडले गेले नाही. परिणामी, पैदास जास्त असलेला चिलापी जातीचाच मासा उजनीमध्ये तग धरून आहे. दुसऱ्या जातीच्या माशांचे बीज सोडले नसल्याने ते एक तर दुर्मिळ झाले आहेत किंवा नामशेष झाले आहेत. परप्रांतीय मच्छीमार वडाप प्रकारच्या जाळ्याचा मासेमारीसाठी वापर करतात. या प्रकारच्या जाळ्यामध्ये माशांसह इतर मत्स्यबीजाचीही मोठ्याप्रमाणात शिकार केली जाते. १५ वर्षांपासून मत्स्यबीज नाही सोडलेचिलापी मासा घाण पाण्यामध्येही वाढतो. पूर्वी सापडणारे रव, कतला, मिरगळ, सफरनेस, खदराट, घोगरा, आहेर, कोळीस, वाम, मरळ आदी प्रकारचे मासे आता उजनीत सापडत नाहीत. मागील १५ वर्षांपासून मत्स्यबीज न सोडल्याचा हा परिणाम आहे. मोजक्याच मच्छीमारांना परवानगी दिलीउच्च न्यायालयानेही स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. त्याप्रमाणे महिन्याला ५०० रुपये कराने जलसंपदा विभागाने स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी दिली होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही काही मोजक्याच सुशिक्षित स्थानिक मच्छीमारांना ५०० रुपये घेऊन परवाने दिले. तर, बराचशा स्थानिक अशिक्षित मच्छीमारांचे ५०० रु. घेऊन अद्याप त्यांना परवाने दिले गेले नाहीत. ही संख्या मोठी आहे. स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश आहे. मात्र, काही स्थानिक गावगुंडांनी परप्रांतीय मच्छीमारांना हाताशी धरून उजनीतील मत्स्यबीजाची शिकार चालवली आहे. मासे पकडण्याच्या जाळ््याऐवजी परप्रांतीयांनी चक्क मच्छरदानीचाच वापर सुरू केला आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात मत्स्यबीजाची शिकार होत आहे. हे सर्व मत्स्यबीज सुकवून हावडा येथील बाजारपेठेत पाठवतात. त्यातूून मोठ्याप्रमाणात माया कमवली जात आहे. या सर्व प्रकारावर उच्च न्यायालयात २ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. - चंदू भोई, अध्यक्ष, उजनी मच्छीमार बचाव अभियान