शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कळमोडीचे पाणी पुन्हा अडवले

By admin | Updated: November 24, 2015 00:48 IST

कळमोडी धरणातून पोलीस बंदोबस्तामध्ये रविवारी सोडण्यात आलेले पाणी स्थानिक शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी पुन्हा बंद केले.

चासकमान : कळमोडी धरणातून पोलीस बंदोबस्तामध्ये रविवारी सोडण्यात आलेले पाणी स्थानिक शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी पुन्हा बंद केले. शेतकरी व कृती समितीला विश्वासात न घेताच पाटबंधारे विभागाने पोलीसबळाचा वापर करून कळमोडी धरणातले पाणी १९५ क्युसेक्स वेगाने आरळा नदीपात्रात सोडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. पहिले पाणी सोडले त्या वेळेस शेतकऱ्यांनी पाणी बंद केले होते. चासकमान शाखा अभियंता पडवळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पाणी सोडण्यात येईल, असे त्या वेळी सांगितले होते. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या उद्रेकाच्या भीतीपोटी पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणात रविवारी पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेचे आश्वासन देऊनही, रविवारी कळमोडी धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी धरणावर जात पाण्याच्या विसर्ग थांबवला. यापुढे संबंधित अधिकारी यांनी शेतकरी कृती समितीबरोबर चर्चा केल्याशिवाय धरणातून पाण्याचा एक थेंब खाली जाऊन देणार नाही, असा ठाम निर्णय घेतला. पाणी बंद करण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गोपाळे, लक्ष्मणराव मुके, पांडुरंग गोपाळे, धारू कृष्णा गवारी, संतोष गोपाळे, काशीनाथ गोपाळे, सुदाम पवार, संतोष कदम, गणपत गोपाळे यांसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)