शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

इंद्रायणी नदीतील पाणी शेवाळल्याने सुटली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

- इंद्रायणीतील प्रदूषण भाग १ - आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड ...

- इंद्रायणीतील प्रदूषण भाग १ -

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मैलामिश्रित सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी हे पूर्णतः शेवाळले असून, जलपर्णीच्या विळख्यात सापडले आहे. नदीतील पाण्याला अक्षरशः दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन रोगराई वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरी शहरासह लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तर शहरालगतच्या गावांचीही लोकसंख्या हजारोंच्या घरात आहे. शहरातील तसेच लगतच्या गावांमधील बहुतांश सर्वच नागरिक इंद्रायणीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून पवित्र इंद्रायणीच्या पाण्याला प्रदूषणाचे ग्रहण जडले आहे. आळंदीच्या पश्चिमेला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची मोठी लोकसंख्या असून विविध कारखाने सुरू आहेत. परिणामी या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या-ज्या उद्योगात किंवा व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर रसायन मिश्रीत पाणी विनाप्रक्रिया थेट इंद्रायणीच्या नदीपात्रात छुप्या मार्गाने सोडले जात आहे.

औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी आळंदीत वाहत येते. पावसाळ्यातील पुरात हे पाणी पुढे वाहून जाते, मात्र पावसाळा वगळता आठ महिने हे अशुद्ध पाणी नदीपात्रात साचले जाते. याच पाण्याचा उपयोग आळंदीकरांना करावा लागत आहे. सद्यस्थितीत नदीतील जलपर्णीयुक्त पाण्याचा उग्र वास येत असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार वाढण्याची चिन्हे आहेत.

"मैलामिश्रित तसेच रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही अशांवर कारवाई केली जात नाही.

- संदीप नाईकरे, आळंदी विकास मंच.

तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीतील दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे.