शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदीतील पाणी शेवाळल्याने सुटली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

- इंद्रायणीतील प्रदूषण भाग १ - आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड ...

- इंद्रायणीतील प्रदूषण भाग १ -

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहरातून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीत मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील मैलामिश्रित सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत इंद्रायणी नदीतील पाणी हे पूर्णतः शेवाळले असून, जलपर्णीच्या विळख्यात सापडले आहे. नदीतील पाण्याला अक्षरशः दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन रोगराई वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरी शहरासह लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तर शहरालगतच्या गावांचीही लोकसंख्या हजारोंच्या घरात आहे. शहरातील तसेच लगतच्या गावांमधील बहुतांश सर्वच नागरिक इंद्रायणीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून पवित्र इंद्रायणीच्या पाण्याला प्रदूषणाचे ग्रहण जडले आहे. आळंदीच्या पश्चिमेला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची मोठी लोकसंख्या असून विविध कारखाने सुरू आहेत. परिणामी या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या-ज्या उद्योगात किंवा व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर रसायन मिश्रीत पाणी विनाप्रक्रिया थेट इंद्रायणीच्या नदीपात्रात छुप्या मार्गाने सोडले जात आहे.

औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित पाणी आळंदीत वाहत येते. पावसाळ्यातील पुरात हे पाणी पुढे वाहून जाते, मात्र पावसाळा वगळता आठ महिने हे अशुद्ध पाणी नदीपात्रात साचले जाते. याच पाण्याचा उपयोग आळंदीकरांना करावा लागत आहे. सद्यस्थितीत नदीतील जलपर्णीयुक्त पाण्याचा उग्र वास येत असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार वाढण्याची चिन्हे आहेत.

"मैलामिश्रित तसेच रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही अशांवर कारवाई केली जात नाही.

- संदीप नाईकरे, आळंदी विकास मंच.

तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीतील दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक ठरत आहे.