शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

पुण्यावर पाणीकपातीचे पुन्हा सावट?

By admin | Updated: March 28, 2015 23:45 IST

नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे.

पुणे : नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पानशेत वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणार २७ मार्च अखेर १२.२५ टीएमसी पाणीसाठा शिल्ल्क असून मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठी १३़२० टीएमसी होता. मात्र, त्यानंतरही जून महिन्यापासून पुणेकरांच्या पाण्यात १२ टक्के कपात करून एकवेळ पाणी देण्यास सुरूवात केली होती. मात्र, या वर्षी मागील वर्षीपेक्षा एक टीएमसी कमी पाणी असल्याने ही कपात एक महिना आधीच लागू करण्याची भिती व्यक्त केली जात आहे. धरणांमधील पाण्याने मागील वर्षी जून २०१४ महिन्यात तळ गाठला होता. त्यातच राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूनने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे २ टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे २८ जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात १२ टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता. मात्र, जुलै महिन्याच्या दुस-या आठवडयातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच नसल्याने महापालिकेने ही पाणीकपात ३५ टक्क्यांवर नेत शहरात ११ जुलै पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. या वेळी या धरणांमध्ये अवघा १.१० टीएमसी पाणीसाठा होता. मात्र १२ जुलै नंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शहरातील पाणी कपात मागे घेण्यात आली. त्यानंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता.