शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरवर पाणीसंकट

By admin | Updated: May 25, 2016 04:39 IST

साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली

राजगुरुनगर : साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली आहे, की त्याचे पडसाद समाज माध्यमांमध्ये उमटत आहेत. गावकऱ्यांना ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ अशी पोस्ट सर्वत्र फिरत आहे. राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याची पाणीपातळी आता खूपच खाली गेली आहे. बंधाऱ्याचे पात्र उघडे पडून वाळू दिसू लागली आहे. आधीच पाणी अत्यल्प आणि त्यात सांडपाणी येत असल्याने असलेले पाणीही खूप खराब झाले आहे. ते शेवाळले आहे. तसेच त्याला दुर्गंध येत आहे. या पार्श्वभूमीवर चासकमानच्या धरणातून केदारेश्वर बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी नगर परिषदने पुणे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्याकडेही आपली मागणी दिली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनी दिली. आमदार सुरेश गोरे यांनी राजगुरुनगरला लगेच पाणी सोडण्यात यावे, असे संबंधितांना कळविले आहे. बंधाऱ्यावरील भागातून शेतीसाठी होणारा पाणीउपसा आणि तीव्र उन्हाळा यामुळे पाणीसाठा संपला असून सध्या दूषित झालेला जलस्रोत आणि अल्पसाठ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पाणी सोडावे, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले. (वार्ताहर)नळातून गावाला काळपट हिरवे पाणी सध्या पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याने हे सांडपाणी आणि शेवाळलेले पाणी काही प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाझरत असून गावाला काळपट हिरवे पाणी नळातून येत आहे. हेच पाणी गावकऱ्यांना वापरावे लागत असून आता ते अंघोळ करण्याच्याही लायकीचे राहिले नाही. पिण्यासाठी लोक दुसरे पाणी वापरत असून सध्याच्या पाण्याने चूळसुद्धा भरता येत नाही. तसेच गावातील लोकांना या पाण्यामुळे त्वचेला खाज येण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आणखी १० दिवस अशुद्ध पाणी?जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण होऊन गावाला आठवड्यात शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल, असे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे. पण तोपर्यंत सुमारे १० दिवस सध्याचे दूषित पाणी वापरणे अशक्यप्राय आहे. तसेच शुद्ध पाणी देण्यासाठी मुळात बंधाऱ्यात पाणी असणे आवश्यक आहे. म्हणून चासकमान धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.उपशाला घाला पायबंद : गोरे राजगुरुनगरला पाणी सोडण्यात येईल, पण आता नगर परिषदेने ते काटकसरीने वापरावे, असे आमदार सुरेश गोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाण्याची गळती, त्याचे दूषित होणे आणि इतर कारणांसाठी होणारा उपसा याला पायबंद घालावा आणि पाणी जपून वापरावे, असेही त्यांनी सांगितले. धरणात अत्यल्प पाणी असल्याने आणि पाऊस लांबला तर यापुढे पाणी सोडणे कदाचित शक्य होणार नाही, असे गोरे म्हणाले.