शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरवर पाणीसंकट

By admin | Updated: May 25, 2016 04:39 IST

साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली

राजगुरुनगर : साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली आहे, की त्याचे पडसाद समाज माध्यमांमध्ये उमटत आहेत. गावकऱ्यांना ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ अशी पोस्ट सर्वत्र फिरत आहे. राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याची पाणीपातळी आता खूपच खाली गेली आहे. बंधाऱ्याचे पात्र उघडे पडून वाळू दिसू लागली आहे. आधीच पाणी अत्यल्प आणि त्यात सांडपाणी येत असल्याने असलेले पाणीही खूप खराब झाले आहे. ते शेवाळले आहे. तसेच त्याला दुर्गंध येत आहे. या पार्श्वभूमीवर चासकमानच्या धरणातून केदारेश्वर बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी नगर परिषदने पुणे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्याकडेही आपली मागणी दिली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनी दिली. आमदार सुरेश गोरे यांनी राजगुरुनगरला लगेच पाणी सोडण्यात यावे, असे संबंधितांना कळविले आहे. बंधाऱ्यावरील भागातून शेतीसाठी होणारा पाणीउपसा आणि तीव्र उन्हाळा यामुळे पाणीसाठा संपला असून सध्या दूषित झालेला जलस्रोत आणि अल्पसाठ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पाणी सोडावे, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले. (वार्ताहर)नळातून गावाला काळपट हिरवे पाणी सध्या पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याने हे सांडपाणी आणि शेवाळलेले पाणी काही प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाझरत असून गावाला काळपट हिरवे पाणी नळातून येत आहे. हेच पाणी गावकऱ्यांना वापरावे लागत असून आता ते अंघोळ करण्याच्याही लायकीचे राहिले नाही. पिण्यासाठी लोक दुसरे पाणी वापरत असून सध्याच्या पाण्याने चूळसुद्धा भरता येत नाही. तसेच गावातील लोकांना या पाण्यामुळे त्वचेला खाज येण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आणखी १० दिवस अशुद्ध पाणी?जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण होऊन गावाला आठवड्यात शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल, असे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे. पण तोपर्यंत सुमारे १० दिवस सध्याचे दूषित पाणी वापरणे अशक्यप्राय आहे. तसेच शुद्ध पाणी देण्यासाठी मुळात बंधाऱ्यात पाणी असणे आवश्यक आहे. म्हणून चासकमान धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.उपशाला घाला पायबंद : गोरे राजगुरुनगरला पाणी सोडण्यात येईल, पण आता नगर परिषदेने ते काटकसरीने वापरावे, असे आमदार सुरेश गोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाण्याची गळती, त्याचे दूषित होणे आणि इतर कारणांसाठी होणारा उपसा याला पायबंद घालावा आणि पाणी जपून वापरावे, असेही त्यांनी सांगितले. धरणात अत्यल्प पाणी असल्याने आणि पाऊस लांबला तर यापुढे पाणी सोडणे कदाचित शक्य होणार नाही, असे गोरे म्हणाले.