शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

राजगुरुनगरवर पाणीसंकट

By admin | Updated: May 25, 2016 04:39 IST

साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली

राजगुरुनगर : साधे स्वच्छ पाणी तर सोडाच; परंतु अक्षरश: सांडपाण्यासारखे पाणी राजगुरुनगरमध्ये येत असल्याने राजगुरुनगरवर पाणीसंकट आलेले आहे. इतकी कठीण परिस्थिती झाली आहे, की त्याचे पडसाद समाज माध्यमांमध्ये उमटत आहेत. गावकऱ्यांना ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ अशी पोस्ट सर्वत्र फिरत आहे. राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याची पाणीपातळी आता खूपच खाली गेली आहे. बंधाऱ्याचे पात्र उघडे पडून वाळू दिसू लागली आहे. आधीच पाणी अत्यल्प आणि त्यात सांडपाणी येत असल्याने असलेले पाणीही खूप खराब झाले आहे. ते शेवाळले आहे. तसेच त्याला दुर्गंध येत आहे. या पार्श्वभूमीवर चासकमानच्या धरणातून केदारेश्वर बंधाऱ्यात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी नगर परिषदने पुणे पाटबंधारे विभागाकडे केली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्याकडेही आपली मागणी दिली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनी दिली. आमदार सुरेश गोरे यांनी राजगुरुनगरला लगेच पाणी सोडण्यात यावे, असे संबंधितांना कळविले आहे. बंधाऱ्यावरील भागातून शेतीसाठी होणारा पाणीउपसा आणि तीव्र उन्हाळा यामुळे पाणीसाठा संपला असून सध्या दूषित झालेला जलस्रोत आणि अल्पसाठ्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पाणी सोडावे, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले. (वार्ताहर)नळातून गावाला काळपट हिरवे पाणी सध्या पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याने हे सांडपाणी आणि शेवाळलेले पाणी काही प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पाझरत असून गावाला काळपट हिरवे पाणी नळातून येत आहे. हेच पाणी गावकऱ्यांना वापरावे लागत असून आता ते अंघोळ करण्याच्याही लायकीचे राहिले नाही. पिण्यासाठी लोक दुसरे पाणी वापरत असून सध्याच्या पाण्याने चूळसुद्धा भरता येत नाही. तसेच गावातील लोकांना या पाण्यामुळे त्वचेला खाज येण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आणखी १० दिवस अशुद्ध पाणी?जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण होऊन गावाला आठवड्यात शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल, असे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे. पण तोपर्यंत सुमारे १० दिवस सध्याचे दूषित पाणी वापरणे अशक्यप्राय आहे. तसेच शुद्ध पाणी देण्यासाठी मुळात बंधाऱ्यात पाणी असणे आवश्यक आहे. म्हणून चासकमान धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.उपशाला घाला पायबंद : गोरे राजगुरुनगरला पाणी सोडण्यात येईल, पण आता नगर परिषदेने ते काटकसरीने वापरावे, असे आमदार सुरेश गोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाण्याची गळती, त्याचे दूषित होणे आणि इतर कारणांसाठी होणारा उपसा याला पायबंद घालावा आणि पाणी जपून वापरावे, असेही त्यांनी सांगितले. धरणात अत्यल्प पाणी असल्याने आणि पाऊस लांबला तर यापुढे पाणी सोडणे कदाचित शक्य होणार नाही, असे गोरे म्हणाले.