शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

काळया यादीतील कंपनीची निवड करण्यासाठीच २५ वेळा मुदत वाढ दिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महायटीकडून चार कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी दोन कंपन्या काळ्या ...

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महायटीकडून चार कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील असल्याचे समोर आले आहे.

यामुळे काळ्या यादीतील कंपन्याकडून मोठा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

भरती प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण १८ कंपन्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ कंपन्या निवडल्या आहेत. यातून अंतिम एक कंपनीची निवड करणार आहे. मात्र या चार पैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील आहेत. एका कंपनीला महाराष्ट्र राज्य परिषदेने गुणांची चुकीची टक्केवारी, गुणांमध्ये तफावत, अपात्र असताना पात्र ठरविले गेले या कारणांवरून काळ्या यादीत टाकले. असे समोर आले आहे. तसेच या कंपन्यांची निवड होण्यासाठी तब्बल २५ वेळा मुदत वाढ दिली होती का ? असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

महाआयटीकडून कोणत्याही प्रकारे ई-निविदा प्रक्रिया राबविली नाही.? ही निवड प्रक्रिया गेल्या ६ महिन्यांपासून राबवित आहे. यातून नेमके काय साधले गेले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.? महापोर्टल पूर्ण भ्रष्ट होते म्हणून सरकारने ते बंद केले. आता अशा कंपन्यांची निवड केली जात असून यातून नक्कीच उमेदवारांचे हित साधले जाणार की राजकीय पोळी भाजली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.?

चौकट

केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राबवावी भरती प्रक्रिया

राज्यातील सरकारी नोकर भरती साठी एकच आयोग असावा यासाठी मागील दीड वर्षापासून मागणी केली जात आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे. तशी तरी देखील एमपीएससीने दर्शीविली आहे.

कोट

एमपीएससीचे काम टीसीएस कंपनी काम पाहते. तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे सत्र सुरू ठेवण्यासाठीच काळ्या यादीतील कंपनी पात्र ठरविली आहे. आर्थिक हित संबंधापुढे कोणत्याही सरकारला युवकांची काळजी नाही हे स्पष्ट होत आहे.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स

सुमारे २७ हजार पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविणार आहे. तरी ई निविदा प्रक्रिया राबविली नाही. कोणत्या निकषांवर कंपन्या निवडल्या आहेत याची माहिती राज्य सरकारने द्यावी. यामुळे पुन्हा भ्रष्टाचार होणार नाही याची खात्री सरकार कसे देणार आहे.

- ऋषिकेश चव्हाण, विद्यार्थी