शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

काळया यादीतील कंपनीची निवड करण्यासाठीच २५ वेळा मुदत वाढ दिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महायटीकडून चार कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी दोन कंपन्या काळ्या ...

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महायटीकडून चार कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील असल्याचे समोर आले आहे.

यामुळे काळ्या यादीतील कंपन्याकडून मोठा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

भरती प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण १८ कंपन्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ कंपन्या निवडल्या आहेत. यातून अंतिम एक कंपनीची निवड करणार आहे. मात्र या चार पैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील आहेत. एका कंपनीला महाराष्ट्र राज्य परिषदेने गुणांची चुकीची टक्केवारी, गुणांमध्ये तफावत, अपात्र असताना पात्र ठरविले गेले या कारणांवरून काळ्या यादीत टाकले. असे समोर आले आहे. तसेच या कंपन्यांची निवड होण्यासाठी तब्बल २५ वेळा मुदत वाढ दिली होती का ? असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

महाआयटीकडून कोणत्याही प्रकारे ई-निविदा प्रक्रिया राबविली नाही.? ही निवड प्रक्रिया गेल्या ६ महिन्यांपासून राबवित आहे. यातून नेमके काय साधले गेले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.? महापोर्टल पूर्ण भ्रष्ट होते म्हणून सरकारने ते बंद केले. आता अशा कंपन्यांची निवड केली जात असून यातून नक्कीच उमेदवारांचे हित साधले जाणार की राजकीय पोळी भाजली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.?

चौकट

केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राबवावी भरती प्रक्रिया

राज्यातील सरकारी नोकर भरती साठी एकच आयोग असावा यासाठी मागील दीड वर्षापासून मागणी केली जात आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे. तशी तरी देखील एमपीएससीने दर्शीविली आहे.

कोट

एमपीएससीचे काम टीसीएस कंपनी काम पाहते. तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे सत्र सुरू ठेवण्यासाठीच काळ्या यादीतील कंपनी पात्र ठरविली आहे. आर्थिक हित संबंधापुढे कोणत्याही सरकारला युवकांची काळजी नाही हे स्पष्ट होत आहे.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स

सुमारे २७ हजार पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविणार आहे. तरी ई निविदा प्रक्रिया राबविली नाही. कोणत्या निकषांवर कंपन्या निवडल्या आहेत याची माहिती राज्य सरकारने द्यावी. यामुळे पुन्हा भ्रष्टाचार होणार नाही याची खात्री सरकार कसे देणार आहे.

- ऋषिकेश चव्हाण, विद्यार्थी