शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

काळया यादीतील कंपनीची निवड करण्यासाठीच २५ वेळा मुदत वाढ दिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महायटीकडून चार कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी दोन कंपन्या काळ्या ...

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महायटीकडून चार कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील असल्याचे समोर आले आहे.

यामुळे काळ्या यादीतील कंपन्याकडून मोठा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

भरती प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण १८ कंपन्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ कंपन्या निवडल्या आहेत. यातून अंतिम एक कंपनीची निवड करणार आहे. मात्र या चार पैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील आहेत. एका कंपनीला महाराष्ट्र राज्य परिषदेने गुणांची चुकीची टक्केवारी, गुणांमध्ये तफावत, अपात्र असताना पात्र ठरविले गेले या कारणांवरून काळ्या यादीत टाकले. असे समोर आले आहे. तसेच या कंपन्यांची निवड होण्यासाठी तब्बल २५ वेळा मुदत वाढ दिली होती का ? असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

महाआयटीकडून कोणत्याही प्रकारे ई-निविदा प्रक्रिया राबविली नाही.? ही निवड प्रक्रिया गेल्या ६ महिन्यांपासून राबवित आहे. यातून नेमके काय साधले गेले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.? महापोर्टल पूर्ण भ्रष्ट होते म्हणून सरकारने ते बंद केले. आता अशा कंपन्यांची निवड केली जात असून यातून नक्कीच उमेदवारांचे हित साधले जाणार की राजकीय पोळी भाजली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.?

चौकट

केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राबवावी भरती प्रक्रिया

राज्यातील सरकारी नोकर भरती साठी एकच आयोग असावा यासाठी मागील दीड वर्षापासून मागणी केली जात आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे. तशी तरी देखील एमपीएससीने दर्शीविली आहे.

कोट

एमपीएससीचे काम टीसीएस कंपनी काम पाहते. तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे सत्र सुरू ठेवण्यासाठीच काळ्या यादीतील कंपनी पात्र ठरविली आहे. आर्थिक हित संबंधापुढे कोणत्याही सरकारला युवकांची काळजी नाही हे स्पष्ट होत आहे.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स

सुमारे २७ हजार पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविणार आहे. तरी ई निविदा प्रक्रिया राबविली नाही. कोणत्या निकषांवर कंपन्या निवडल्या आहेत याची माहिती राज्य सरकारने द्यावी. यामुळे पुन्हा भ्रष्टाचार होणार नाही याची खात्री सरकार कसे देणार आहे.

- ऋषिकेश चव्हाण, विद्यार्थी