शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

काळया यादीतील कंपनीची निवड करण्यासाठीच २५ वेळा मुदत वाढ दिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महायटीकडून चार कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी दोन कंपन्या काळ्या ...

पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महायटीकडून चार कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील असल्याचे समोर आले आहे.

यामुळे काळ्या यादीतील कंपन्याकडून मोठा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

भरती प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण १८ कंपन्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ कंपन्या निवडल्या आहेत. यातून अंतिम एक कंपनीची निवड करणार आहे. मात्र या चार पैकी दोन कंपन्या काळ्या यादीतील आहेत. एका कंपनीला महाराष्ट्र राज्य परिषदेने गुणांची चुकीची टक्केवारी, गुणांमध्ये तफावत, अपात्र असताना पात्र ठरविले गेले या कारणांवरून काळ्या यादीत टाकले. असे समोर आले आहे. तसेच या कंपन्यांची निवड होण्यासाठी तब्बल २५ वेळा मुदत वाढ दिली होती का ? असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

महाआयटीकडून कोणत्याही प्रकारे ई-निविदा प्रक्रिया राबविली नाही.? ही निवड प्रक्रिया गेल्या ६ महिन्यांपासून राबवित आहे. यातून नेमके काय साधले गेले असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.? महापोर्टल पूर्ण भ्रष्ट होते म्हणून सरकारने ते बंद केले. आता अशा कंपन्यांची निवड केली जात असून यातून नक्कीच उमेदवारांचे हित साधले जाणार की राजकीय पोळी भाजली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.?

चौकट

केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राबवावी भरती प्रक्रिया

राज्यातील सरकारी नोकर भरती साठी एकच आयोग असावा यासाठी मागील दीड वर्षापासून मागणी केली जात आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे. तशी तरी देखील एमपीएससीने दर्शीविली आहे.

कोट

एमपीएससीचे काम टीसीएस कंपनी काम पाहते. तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे सत्र सुरू ठेवण्यासाठीच काळ्या यादीतील कंपनी पात्र ठरविली आहे. आर्थिक हित संबंधापुढे कोणत्याही सरकारला युवकांची काळजी नाही हे स्पष्ट होत आहे.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स

सुमारे २७ हजार पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविणार आहे. तरी ई निविदा प्रक्रिया राबविली नाही. कोणत्या निकषांवर कंपन्या निवडल्या आहेत याची माहिती राज्य सरकारने द्यावी. यामुळे पुन्हा भ्रष्टाचार होणार नाही याची खात्री सरकार कसे देणार आहे.

- ऋषिकेश चव्हाण, विद्यार्थी