शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

वादळामुळे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ताैक्ते वादळाचा जिल्ह्यात फारसा फटका बसणार नसला, तरी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ताैक्ते वादळाचा जिल्ह्यात फारसा फटका बसणार नसला, तरी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा परिषदेतर्फे घाटमाथ्यावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहे. यासोबतच तत्काळ मदत देण्यासाठी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. गावांत, रस्त्यात वादळी वाऱ्यामुळे घरे किंवा झाडे पडल्यास तत्काळ मदतीसाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीने एक जेसीबी व मजुरांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

कोकण किनारपट्टीवर रविवारी ताैक्ते चक्रीवादळ धडकले. या वादळामुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा आणि पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घाट माथ्यावरील गावांना याचा धोका असल्याने प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या सर्व भागात ढगाळ हवामान व वादळी वारे सुटले होते. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले होते, तर घरांचे पत्र उडाली. वादळाच्या शक्यतेमुळे ग्रामसेवकांनी गावातच मुख्यालयात राहावे. ज्या शासकीय इमारतींची दुरवस्था झाली आहे किंवा त्यांची छपरे कमकुवत आहे, अशा इमारतीपासून कर्मचाऱ्यांनी लांब राहावे. तसेच, छपरे उडून जाऊ नयेत यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवाव्या जेणेकरून ते वाऱ्याच्या वेगाने उडणार नाहीत. घरे पडल्यास किंवा रस्ते बंद झाल्यास ते लवकर सुरू करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायतींनी एका जेसीबीची व्यवस्था करावी. तसेच मजुरांचीही व्यवस्था करावी जेणे करून त्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येईल.

तत्काळ मदतीसाठी धोकादायक ठिकाणांना अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्या ठिकाणी मदतीची योग्य व्यवस्था करण्यात यावी. तालुकास्तरावर कंट्रोल रूमची स्थापना करून तेथून सर्व परिस्थिती हाताळण्यात यावी. अधिकाऱ्यांची, तसेच सभापतींची वाहने मदत पोहोचवण्यासाठी तयार ठेवली जावी, अशा आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

चौकट

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तयार ठेवा

नागरिकांना प्रथोमोपचार देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रम, उपकेंद्रावर योग्य व्यवस्था करण्यात यावी. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका तयार असाव्या तसेच चालकांनाही तयार ठेवा. कुठल्याही आपात्कलीन परिस्थिती त्या तयार असायला हव्या अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना वादळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्या आहेत.

कोट

गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला होता. या वर्षीही तौक्ते वादळामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार कुठल्याही आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद