शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

वाघेश्वर मंदिर परिसर विकासास गती

By admin | Updated: November 16, 2015 01:50 IST

चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वरमहाराज मंदिर परिसर विकासाचा व जीर्णाेद्धाराचा विडा येथील स्वकाम सेवा संघाने उचलला आहे. गेल्या २० वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या

अंगद राठोडकर, दिघीचऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्वरमहाराज मंदिर परिसर विकासाचा व जीर्णाेद्धाराचा विडा येथील स्वकाम सेवा संघाने उचलला आहे. गेल्या २० वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेल्या या कामाने गेल्या दोन वर्षांत चांगलाच वेग घेतला आहे. मंदिराचा चेहरा-मोहराच बदलून गेलेला दिसत आहे. बाजूने संथ गतीने वाहणारी पवित्र इंद्रायणी, मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या, भाविकांचे स्वागत करणारी भव्य कमान, त्यातून आत जाताच छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, आकर्षक कोरीव नक्षीकाम केलेले दगडी खांब व केवळ दगडांचाच वापर करून उभारण्यात आलेला सभामंडप, उंच शिखर, आध्यात्मिक व वैज्ञानिक जगाला गवसणी घालणारे सुसज्ज गुरुकुल, मुबलक पाणी, लखलखणारा तेजोमय प्रकाश, नयनरम्य व विस्तीर्ण उद्यान असा मंदिर परिसर तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी २५ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. उर्वरित कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सेवा संघाने दिली. देवगिरीचे राजे यादवराजा यांच्या काळात मंदिराचे बांधकाम झाल्याचा उल्लेख येथील शिलालेखावरून समजतो. विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या मावशी गोदाबाई कुलकर्णी याच चऱ्होलीच्या. त्यांची भावंडे व त्यांचा सततचा सहवास या गावाला लाभलेला. बाराव्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिर व आसपासच्या परिसरात वाघांची संख्या अधिक असल्यामुळेच या परिसराचा उल्लेख ज्ञानेश्वरीत ‘व्याघ्रेश्वरी’असा करण्यात आल्याचे दिसून येते. निसर्गसृष्टीने नटलेला डोंगर-दऱ्यांचा भाग, बाजूने वाहणारी पवित्र इंद्रायणी, समृद्ध शेती व अपार कष्ट करून सुखी झालेला शेतकरी, अशीच चऱ्होलीची ओळख आहे. गाव आणि बारा वाड्या व पंचक्रोशीतील नागरिक भक्तीभावाने व श्रद्धेने ग्रामदैवत वाघेश्वरमहाराजांची पूजा, आरती करतात. १९६७ मध्ये श्रावणी सोमवारी नागराज वाघेश्वर महाराजांच्या पिंडीवर अवतरले. ते तब्बल आठवडाभर पिंडीवरच बसून असल्याचे सांगण्यात येते. आळंदी येथील सुरेश फोटो स्टुडिओत त्या वेळचे फोटो आजही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. दोन कोटींच्या प्रस्तावित खर्चात वाढ होऊन हा खर्च अडीच कोटींपेक्षा जास्त होत असल्यामुळे दानशूरांनी पुढे येऊन विकासाला हातभार लावण्याची गरज असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मंदिर परिसरात विविध कामे करण्यात येत आहेत. हा परिसर आगामी काळात एक आकर्षक पर्यटनस्थळ व्हावे, ही ग्रामस्थांची इच्छा आहे.