शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

भोरला अनियमित पाणी

By admin | Updated: December 9, 2014 00:05 IST

अनियमित तसेच कमी वेळ आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठय़ामुळे भोर शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपलिकेचे कर्मचारी उद्धट उत्तरे देतात.

भोर : अनियमित तसेच कमी वेळ आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठय़ामुळे भोर शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपलिकेचे कर्मचारी उद्धट उत्तरे देतात.  सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी वारंवार मागणी  करूनही दुर्लक्ष होते. त्यामुळे आज संतप्त तरुणांनी थेट मुख्याधिका:यांपुढे तक्रारींचा पाढा वाचला.
शहराला शंकर हिल येथील टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. नवी आळी, मदार मोहल्ला व मंगळवार पेठेत  एकाच वेळी पाणीपुरवठा होतो. उतार असल्याने पाणी खाली जाते व पाईपलाईन जुनी असल्याने गळती होते. त्यामुळे मंगळवार पेठेत वेळेवर पाणी येत नाही. परिणामी, महिलांना पाण्याची वाट पाहत थांबावे लागते. पाणी आले तरी कमी दाबाने येते. मोटारीचा (पंप) वापर करावा लागतो. 
याबाबत नगरपलिकेच्या कर्मचा:यांना विचारले, तर ‘येतंय तेवढं घ्या!’ असे उद्धट उत्तर दिले जाते. 
या कर्मचा:यांची प्रथम बदली करा, अशी मागणी तरुणांनी मुख्याधिका:यांकडे केली. या वेळी मारुती सागळे, संतोष वीर, विजय आंबवले, महेश उल्हाळकर, संजय आंबवले, गणोश धोत्रे, लहू सागळे, पोपट जाधव, अक्षय सागळे, प्रवीण सागळे, पिंटू धोत्रे व तरुण उपस्थित होते.
भाटघर धरण उशाला असूनही शहराला पाणी पुरवठा करण्यास अडचणी कशाकाय येतात? धरण उशाला कोरड घशाला अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होते आहे. 
शहराला पाणी पुरवठा करणा:या टाक्यांची क्षमता वाढविण्याची गरज आहे. जुन्या पाईप लाईनही नादुरुस्त आहे त्यातूनही मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. 
 
4मंगळवार पेठ ही मुख्य बाजारपेठ आहे. किराणा, व्यापारी, कापड दुकाने आहेत. मात्र, पालिकेतील कर्मचा:यांमुळे अनेक दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. याकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी शेवटी पालिकेकडे आपला मोर्चा वळविला. 
 
सदरच्या पाईपवर तीन आळ्यांचा पाणीपुरवठा होतो. शिवाय, पाईपलाईन जुनी असल्याने गळते. उतारही आहे. यामुळे पाणीपुरवठा होत नसेल. याची महिती घेऊन मंगळवार पेठेतील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत केला जाईल 
- संजय केदार, मुख्याधिकारी