शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

भूसंपादनात शिरलाय ‘व्हायरस’

By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST

जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात येत

वाकड : जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या पर्यायी रस्त्यांच्या कामाला भूसंपादनाची बाधा झाल्याने ही कामे रखडली आहेत. स्थानिकांचा विरोध अन एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेने ही बाधा लवकर सुटण्याचे चिन्ह दिसत नाहीत. युद्धपातळीवर हे काम सुरूअसल्याचे भासविले जात असले, तरी अद्याप काही रस्त्यांचे भूसंपादनदेखील झाले नसल्याचे लोकमतने घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे. वाहतूककोंडीतून मार्ग काढून आयटीयन्सचा वेळ वाचविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पर्यायी रस्त्यांचे काम युद्धपातळीवर करून ते रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्याशिवाय हिंजवडीतील वाहतूककोंडीची समस्या सुटणार नाही. दरम्यान, वाहतूक विभागाच्या नियोजित संख्येपेक्षा दररोज कित्येक पटीने वाहनांची वर्दळ या ठिकाणी वाढतच आहे. त्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. भूमकर वस्तीपासून विनोदे वस्तीमार्गे हिंजवडी लक्ष्मी चौक ते पुन्हा फेज दोन टाटा जॉन्सन हा रस्ता तीनशे मीटरचा आहे. राजीव गांधी आयटी पार्कमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याकडे जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता फायदेशीर ठरू शकतो. फेज दोनकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित आणि अर्धा रस्ता महापालिकेच्या अंतर्गत असे या सहापदरी रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, रस्त्यावरील एका जुन्या नाल्यावर छत्तीस मीटरचा पूल बांधण्याचे काम सुरू झाल्यांनतर काही स्थानिकांनी विरोध केला त्यामुळे नाल्याचेदेखील काम बंद पडले अन पालिकेने अखेर तो नाला बुजविला. या रस्त्यादरम्यान दोन ठिकाणी मोठ्या लांबीचे काम थांबले आहे. तर विनोदे वस्तीच्या हद्दीपासून पुढील रस्ता अचानक अरुंद झाला आहे. या रस्त्यात प्रचंड तफावत जाणवते, तर लक्ष्मी चौकापासून पुढील रस्त्याचे काम भू-संपादनाला झालेल्या विरोधामुळे थांबले होते. मात्र, हा प्रश्न मार्गी लागल्याने काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. आयटी पार्ककडे चांदे-नांदे मार्गे सूसमध्ये येताच लहान पूल असल्याने वाहतूककोंडी होते. त्यामुळे सूस खिंडीत त्वरित भुयारी मार्ग करावा, जेणेकरून रस्ता मोठा व पर्यायी मिळाल्याने वाहने विनाअडथळा जातील. तसेच वाकड येथील राजीव गांधी पुलाच्या मागील आणि पुढील रस्ता प्रशस्त सहापदरी आहे. मात्र, हा पूल दोनपदरी असल्याने वाहतूक येथे खोळंबते. त्यामुळे या पुलाला आणखी एक समांतर पूल उभारावा, तसेच इन्फोसीस फेज १ ते घोटावडे या १३ किमी लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता चारपदरी केल्यास पिरंगुटमार्गे वाहतूक सुरळीत होईल. अशा अन्य रस्त्यांची मागणी प्रशासनाकडे केल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन व आॅपरेटिंग प्रमुख कर्नल चरणजीत भोगल यांनी दिली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या दोन ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याचे सुचविले होते. (वार्ताहर)लवकरच कामे पूर्ण करणारआयटी पार्कमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काही प्रस्तावित पर्यायी रस्त्यांचे काम पूर्णत्वास जात असून, काही येत्या दोन-तीन महिन्यांत कामे पूर्ण होतील, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सुधीर नागे यांनी दिली. यासह भू-संपादनाला काही स्थानिक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या विरोधामुळे भू-संपादन प्रक्रिया थंडावल्याने कामांना उशीर होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, योग्य तो तोडगा काढून कामे लवकर सुरू करण्याचे पीएमआरडीए आणि एमआयडीसीचे प्रयत्न सुरू आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.कामे अद्याप रखडलेलीपुणे शहरातून आयटी पार्ककडे येताना वारजे, बाणेरमार्गे पुणे-मुंबई महामार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे भुजबळ चौक, शिवाजी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून सूस चांदे-नांदेमार्गे असणाऱ्या जुन्या रस्त्याची एमआयडीसीने डागडुजी व रुंदीकरण कले. मात्र, याची रुंदी कमी असल्याने तो रस्ता वाढवावा, अशी मागणी होत आहे. मात्र, हे काम अद्याप तरी रखडले आहे. यंदाच्या पावसाळ्यात यादेखील पर्यायी रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि रुंदीकरणाचा प्रस्ताव गेला आहे, असे एमआयडीसीकडून सांगण्यात येत आहे.