शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विनोद खन्ना संन्याशाप्रमाणे राहत होते ओशो आश्रमात

By admin | Updated: April 27, 2017 16:02 IST

ऐन बहरात असलेली कारकिर्द सोडून विनोद खन्ना ओशो रजनीश यांचे भक्त झाले. पुण्यातील आश्रमात १९७५ ते १९८१ पर्यंत ते अगदी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - ऐन बहरात असलेली कारकिर्द सोडून विनोद खन्ना ओशो रजनीश यांचे भक्त झाले. पुण्यातील आश्रमात १९७५ ते १९८१ पर्यंत ते अगदी सामान्य संन्याशाप्रमाणे राहत होते. माळीकामही करत होते. ओशो आश्रमातील विनोद खन्ना यांच्या सहकारी आणि ओशो टाईम्सच्या संपादक मा अमृत साधना आठवणी सांगताना म्हणाल्या , ओशोंनी विनोद खन्ना यांना आश्रमातील खासगी उद्यानामध्ये माळीकाम करण्यास सांगितले. एका स्टारचा सारा अहंकार विसर्जित व्हावा असा ओशोंचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. एका लहानशा खोलीमध्ये त्यांना राहण्यासाठी जागा देण्यात आली. त्या खोलीमध्ये या आधी दोन संन्याशांचा मृत्यु झाला आहे, असे अन्य संन्यासी विनोद यांना सांगत. ओशोंची मृत्युविषयी जी शिकवण आहे, ती विनोद जगले. नंतर मृत्यु हा शब्द ऐकल्यावर विनोद खळखळून हसत असत.

त्या म्हणाल्या,   विनोद खन्ना ( स्वामी विनोद भारती) ओशो यांचे परम भक्त होते. त्यांना ध्यानधारणेत खूप रस होता. खूप प्रेमळ माणूस होता.सर्वांशी खेळीमेळीने राहत. त्यांना आश्रमातील लाईफ स्टाईल आवडत असे. ते आश्रम सोडून गेल्यानंतर परत आले नाहीत, मात्र अंतर्मनातून ते ओशोंच्या कायमच सान्निध्यात राहिले. १९७५ ते १९८१ दरम्यान विनोद खन्ना ओशो आश्रमात होते. विजय आनंद, महेश भट, सुभाष घई हेही त्याच वेळी आश्रमात येत असत. चित्रपटांची कामे आटोपून ही मंडळी आश्रमात राहण्यासाठी येत. ओशोंच्या माऊंट अबू येथील शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर विनोद खन्ना यांनी पूर्णवेळ ओशोंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. ओशोंनी त्यांना संमती दिली. मा अमृत साधना म्हणाल्या,  विनोद खन्ना यांना ओशो यांच्या शब्दांनी आयुष्यातील ज्वलंत वास्तवाचा परिचय करवून दिला. वयाच्या आठव्या वर्षापासूनच साधू, संन्यासी यांच्याविषयी विनोद यांना आकर्षण होते. पुढे ते ओशोंची प्रवचने ऐकू लागले. त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर असताना, वयाच्या २६/२७ व्या वर्षी त्यांच्या घरात आई, बहिण यांचा लागोपाठ मृत्यु झाला. विनोद यांनाही मृत्युचे भय वाटू लागले.ओशोंच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी या विभुतीशी आपली अनेक जन्मांची ओळख आहे, असे त्यांना वाटले.लार्जर दॅन लाईफचा अनुभव आला. आपल्या स्वत:च्या घरी परतल्यासारखे वाटले. 

मा अमृत साधना म्हणाल्या, वेगवेगळ्या ध्यानपध्दतींमध्ये विनोद खन्ना सहभागी होत. आश्रमातील सामान्य संन्याशासारखीच त्यांची राहणी होती. त्यांना ध्यानधारणेत खूप रस होता.१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत गेले, तेव्हा विनोद खन्ना त्यांच्यासोबत तिकडे गेले. दोन वर्षे तेथील आश्रमात ते होते. १९८४ मध्ये ओशोंच्या तेथील आश्रमाबाबत वाद उत्पन्न झाला. ओशो वलर््ड टुरवर निघून गेले. त्यानंतर विनोद खन्ना पुन्हा मुंबईत परतले. त्यानंतर ते चित्रपटसृष्टीत व्यग्र झाले. राजकारणात गेले. नंतर ते ओशो आश्रमात आले नाहीत. मात्र आतून ते ओशोंच्या कायमच सान्निध्यात राहिले.