शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वेल्ह्याचे ग्राम न्यायालय निधीअभावी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:09 IST

मार्गासनी: येथे ग्राम न्यायालय उभारण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये आदेश दिले होेते. मात्र, शासकीय काम अन् दहा महिने थांब ...

मार्गासनी: येथे ग्राम न्यायालय उभारण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये आदेश दिले होेते. मात्र, शासकीय काम अन् दहा महिने थांब या उक्तीप्रमाणे हा प्रश्न शासनदरबारी धूळखात पडला आहे. वर्ष-दीड वर्ष होत आले, तरी ग्राम न्यायलयाचे काम पुढे काही सरकेनासे झाले आहे. दरम्यान, निधीअभावी हे काम रखडल्याचे समोर आले असून वेल्ह्यात न्यायालय सुरु करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड राजधानी म्हणून केली

होती.या ठिकाणी २७ वर्षे स्वराज्याचा राज्यकारभार केला होता.राजगडावर स्वराज्यातील न्याय-निवाडा केला जात होता.देश स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊनदेखील वेल्ह्यास ग्राम न्यायालयाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी असून, अठरा गाव मावळ, बारा गाव मावळ, गुंजन मावळ

आदी परिसरात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नाहीत, वेल्हेतील नागरिकांना न्यायासाठी पुणे येथील

जिल्हा न्यायालयात जावे लागत आहे. पुणे ते वेल्हे अंतर ६० किलोमीटर आहे.तसेच अठरा गाव मावळ परिसरातून ८० ते १०० किलोमीटर अंतर जावे लागत असून वेळ आणि आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात

होत आहे.स्वारगेट व भोर आगाराच्या मर्यादित फे-या वेल्ह्यात होत असल्याने केळद,पासली,घोल,चांदर,

वाजेघर,पाल,दादवडी आदी परिसरात दिवसभरातून एकदाच एसटी येत असते त्यामुळे पुणे येथील न्यायालयात

जाण्यासाठी सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.उच्च न्यायालयाने दि ९ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य शासनाला ग्राम न्यायालयासाठी आर्थिक तरतूद,पदनिर्मिती आणि अधिसूचना काढण्यासाठी लेखी स्वरुपात कळविले होते. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील वित्त विभागातून आजपर्यंत वेल्ह्यातील ग्राम न्यायालयासाठीची फाईल धूळखात पडली आहे.तर वेल्ह्यात ग्राम न्यायालय सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.वेल्ह्यात ग्राम न्यायालय कधी सुरू होणार, याकडे वेल्हेकरांचे लक्ष लागले आहे.

केळद ते पुणे हे अंतर ८० ते ९० किलोमीटर असून पुणे येथे न्यायालयाच्या कामासाठी जाण्यासाठी

सकाळी एकच एसटी असून तीच गाडी सायंकाळी ६ वाजता केळदला येते.न्यायालयाच्या कामासाठी वेळेवर गाडी नसल्याने अडचणी

येतात. वेल्ह्यात ग्राम न्यायालय होणे गरजेचे आहे

रमेश शिंदे केळद (ता.वेल्हे)

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेल्हे ग्राम न्यायालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृहामधील हॅाल क्रंमाक २ तोरणा मिळाले असून महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या शनिवारी वेल्ह्यात ग्राम न्यायालय सुरु केले जाणार आहे. मात्र, तालुक्यातील ग्राम न्यायालय निधी अभावी रखडले आहे. १० फेब्रवारी रोजी ग्राम न्यायालयाच्या स्वतंत्र जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

विजय झांजे, अध्यक्ष, बेल्हे बार असोसिएशन