शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

वेल्ह्याचे ग्राम न्यायालय निधीअभावी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:09 IST

मार्गासनी: येथे ग्राम न्यायालय उभारण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये आदेश दिले होेते. मात्र, शासकीय काम अन् दहा महिने थांब ...

मार्गासनी: येथे ग्राम न्यायालय उभारण्यासाठी उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये आदेश दिले होेते. मात्र, शासकीय काम अन् दहा महिने थांब या उक्तीप्रमाणे हा प्रश्न शासनदरबारी धूळखात पडला आहे. वर्ष-दीड वर्ष होत आले, तरी ग्राम न्यायलयाचे काम पुढे काही सरकेनासे झाले आहे. दरम्यान, निधीअभावी हे काम रखडल्याचे समोर आले असून वेल्ह्यात न्यायालय सुरु करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड राजधानी म्हणून केली

होती.या ठिकाणी २७ वर्षे स्वराज्याचा राज्यकारभार केला होता.राजगडावर स्वराज्यातील न्याय-निवाडा केला जात होता.देश स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊनदेखील वेल्ह्यास ग्राम न्यायालयाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी असून, अठरा गाव मावळ, बारा गाव मावळ, गुंजन मावळ

आदी परिसरात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नाहीत, वेल्हेतील नागरिकांना न्यायासाठी पुणे येथील

जिल्हा न्यायालयात जावे लागत आहे. पुणे ते वेल्हे अंतर ६० किलोमीटर आहे.तसेच अठरा गाव मावळ परिसरातून ८० ते १०० किलोमीटर अंतर जावे लागत असून वेळ आणि आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात

होत आहे.स्वारगेट व भोर आगाराच्या मर्यादित फे-या वेल्ह्यात होत असल्याने केळद,पासली,घोल,चांदर,

वाजेघर,पाल,दादवडी आदी परिसरात दिवसभरातून एकदाच एसटी येत असते त्यामुळे पुणे येथील न्यायालयात

जाण्यासाठी सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.उच्च न्यायालयाने दि ९ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य शासनाला ग्राम न्यायालयासाठी आर्थिक तरतूद,पदनिर्मिती आणि अधिसूचना काढण्यासाठी लेखी स्वरुपात कळविले होते. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील वित्त विभागातून आजपर्यंत वेल्ह्यातील ग्राम न्यायालयासाठीची फाईल धूळखात पडली आहे.तर वेल्ह्यात ग्राम न्यायालय सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.वेल्ह्यात ग्राम न्यायालय कधी सुरू होणार, याकडे वेल्हेकरांचे लक्ष लागले आहे.

केळद ते पुणे हे अंतर ८० ते ९० किलोमीटर असून पुणे येथे न्यायालयाच्या कामासाठी जाण्यासाठी

सकाळी एकच एसटी असून तीच गाडी सायंकाळी ६ वाजता केळदला येते.न्यायालयाच्या कामासाठी वेळेवर गाडी नसल्याने अडचणी

येतात. वेल्ह्यात ग्राम न्यायालय होणे गरजेचे आहे

रमेश शिंदे केळद (ता.वेल्हे)

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेल्हे ग्राम न्यायालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृहामधील हॅाल क्रंमाक २ तोरणा मिळाले असून महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या शनिवारी वेल्ह्यात ग्राम न्यायालय सुरु केले जाणार आहे. मात्र, तालुक्यातील ग्राम न्यायालय निधी अभावी रखडले आहे. १० फेब्रवारी रोजी ग्राम न्यायालयाच्या स्वतंत्र जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

विजय झांजे, अध्यक्ष, बेल्हे बार असोसिएशन