शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या तीरावर गाव मात्र पाण्यासाठी धावाधाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:18 IST

प्रशासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे आरो प्लांट बंद आहे, त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आले आहे. गाव जरी पाण्याने ...

प्रशासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे आरो प्लांट बंद आहे, त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आले आहे. गाव जरी पाण्याने भरलेल्या नदीच्या तीरावर असले तरी पिण्यासाठी शुद्ध पाणी लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने वाॅटर फिल्टर प्लांट सुरू करण्यात आला होता. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या वॉटर प्लांट पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. येलवाडी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ घरोघरी पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे लक्षात येताच काही वॉटर एटीएम सेंटरने अन्य ठिकाणाहून वाहतूक करुन प्रक्रिया केलेले पाणी नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्याची कामगिरी काही विक्रेत्यांनी पार पाडली. सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांची गरज ओळखून आपल्याकडील पिण्याचा पाणीसाठा खुला केला आहे.

येलवाडी गावात मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग आहे त्यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतात काम करावे लागते. त्यातच आपल्या मिळालेल्या वेळेत पाणी आणण्यासाठी फिल्टर प्लांट जावे लागते. परंतु ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या वॉटर फिल्टर प्लांटला वेळेचे बंधन असल्यामुळे इतर दिवशीही नागरिकांची अडचण निर्माण होते. त्यामुळे फक्त रात्रीच्या वेळी वॉटर फिल्टर प्लांट बंद करावा व नागरिकांसाठी दिवसभर खुला करण्याची मागणी माजी सरपंच नितीन गाडे यांनी केली आहे.

येलवाडी गावातील पिण्याचा पाण्याचा वाॅटर फिल्टर प्लांट पाच दिवसापासून बंद आहे.