शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

सणासुदीमुळे भाज्या, फळे महाग

By admin | Updated: September 21, 2015 03:58 IST

मागील आठवड्यात तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे आणि सण-उत्सवामुळे भाज्या व फळे महाग झाली आहेत. मात्र महिनाभरापासून कांद्याचे भाव अजूनही स्थिर आहेत.

पिंपरी : मागील आठवड्यात तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे आणि सण-उत्सवामुळे भाज्या व फळे महाग झाली आहेत. मात्र महिनाभरापासून कांद्याचे भाव अजूनही स्थिर आहेत. जुन्या कांद्याची विक्री ५५ ते ६०, तर नवीन कांदा ५० रुपये किलो असा दर आहे. गौरी-गणपतीमुळे सर्वच फळे महागली आहेत. पाच फळांचा वाटा ३० रुपयांना विक्री होत आहे. डाळिंब १०० ते १२० रुपये किलो, तर चिकू ७० रुपये किलोने विक्री सुरू आहे. पेरूस ६० ते ७० रुपये किलो इतका भाव आहे. सीताफळ ७० व संत्रीचे भाव ८० ते ९० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. आवक कमी झाल्याने वाटाणा ३० ते ४० रुपयांनी महाग झाला आहे. १०० रुपये किलो असणारा वाटाणा या आठवड्यात १३० ते १४० रुपये किलो आहे. काकडीच्या भावातही १० रुपयांनी वाढ होऊन ३० रुपये किलो विक्री सुरू आहे. भेंडीच्या दरातही किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात १० रुपये किलो असणारे टोमॅटो २० रुपये किलो झाले आहेत. आवक घटल्याने मेथी २०, तर कोथिंबीर दर २० ते २५ रुपये जुडी आहे. इतर पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. भाज्यांचे किलोसाठीचे दर (रुपयांत) : कांदा- ६०, बटाटा-१५, आले-५०, लसूण-६० ते ९०, वांगी-२०, टोमॅटो-२०, भेंडी-३०, गवार-३०, पावटा-३०, राजमा-३०, वालवर-४०, वाटाणा-१३० ते १४०, शेवगा-४०, चवळी-४०, घेवडा-५०, कोबी-३०, फ्लॉवर-५० ते ६०, मिरची-३०, ढोबळी मिरची-३०, कारले-४०, दोडका-४०, दुधी भोपळा-२०, डांग्या भोपळा-२०, तोंडली-४०, पडवळ-४०. (प्रतिनिधी)