शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

वेध विलिनीकरणाचे : बावधन बुद्रुक १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:11 IST

पायाभूत सुविधांबाबत विरोधाभास नष्ट करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बावधन बुद्रुक या गावात एकीकडे टोलेजंग इमारती, पंचतारांकीत ...

पायाभूत सुविधांबाबत विरोधाभास नष्ट करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बावधन बुद्रुक या गावात एकीकडे टोलेजंग इमारती, पंचतारांकीत क्लब तर दुसरीकडे मात्र पिण्याच्या पाण्याचे हाल, असा विरोधाभास आढळून येतो. रस्ते, ड्रेनेजबाबतही परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

महामार्गाच्या पलिकडे बावधन खुर्द तर दुसरीकडे बावधन बुद्रुक. बावधन खुर्द हे आधीच पुणे महापालिकेत आले असून बावधन बुद्रुकमध्ये मात्र अद्याप ग्रामपंचायत असून विलिनीकरण प्रस्तावीत आहे.

अर्थात बावधन खुर्दचा गेल्या दशकभरात ज्या वेगाने विकास झाला त्याचीच पुनरावृत्ती बावधन बुद्रुकमध्ये आज दिसून येते.

एकीकडे उच्च मध्यमवर्गियांच्या बंगले, संकुले, दुसरीकडे हातावर पोट असणारे श्रमिक. श्रीमंतांनी काही पायाभूत सुविधा मिळवल्या. श्रमिक मात्र त्यापासून आजही वंचित आहे. कात्रज- देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या कडेला राहणारा हा वर्ग कुचंबणा सहन करीत जगत आहे. मागील काही वर्षांपासून बावधन बुद्रुकमध्ये पाण्याची टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी बावधन खुर्दमध्ये जावे लागते, अशी नागरिकांची तक्रार आहे. गावात दिवसाआड येणारे पाणी पुरेसे नाही. महापालिकेतील समावेशानंतर पाणीप्रश्न कायमचा मिटेल, अशी आशा गावकऱ्यांना आहे.

गावातील रस्त्यांच्या दर्जाबाबत नागरीक समाधानी नाहीत. वाढत्या लोकवस्त्या, त्यातील अतिक्रमण यामुळे रस्त्यावर आताच कोंडी आहे. मोठ्या संकुलांची कामे सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यावर या संकटाची तीव्रता वाढणार आहे. प्रत्येक बाबतीत बावधन खुर्द बरोबर तुलना होत असल्याने सध्या येथील मध्यमवर्ग नाराज आहे. विलिनीकरणानंतर विकास कामांसाठी पालिकेकडून निधी मिळेल या अपेक्षेने ते विलिनीकरणाचे स्वागत करीत आहेत.

वारजे पुलाखाली झाले तसे सुशोभीकरण बावधनमधील पुलांचे व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

*कोट*

“पाण्याचा प्रश्नासह ८० % कामे मार्गी लागली आहेत. महापालिकेने एसटीपी प्लांट, उद्यान, उर्वरित पाणी नियोजन, कचरा व्यवस्थापनासाठी भरपूर निधी द्यावा.

-पियुषा दगडे पाटील, सरपंच.

कोट

एवढी मोठी ग्रामपंचायत असताना गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसणे ही फार लाजीरवाणी बाब आहे. महापालिकेने याबाबत ठोस निर्णय घ्यावा.

-मंगेश सावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी

फोटो ओळ : बावधनमधून जाणाऱ्या महामार्गालगत कचरा टाकला जात असून मोकाट जनावरे फिरत असल्याने वाहनधारकांना अडचण निर्माण होते.