शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

वेध विलिनीकरणाचे खडकवासला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

खडकवासला येथे सांडपाणी नाल्यात सोडल्याने दुर्गंधी, अनारोग्याची परिस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराच्या परिघावरील अन्य गावांप्रमाणेच खडकवासला ...

खडकवासला येथे सांडपाणी नाल्यात सोडल्याने दुर्गंधी, अनारोग्याची परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहराच्या परिघावरील अन्य गावांप्रमाणेच खडकवासला येथे सांडपाणी व्यवस्थापन, कचरा, अतिक्रमण अशा समस्यांची तीव्रता वाढली आहे. त्याबाबत महापालिकेने प्राधान्याने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

गावात प्रवेश करतानाच ओढा लागतो त्यात गावातील सांडपाणी आणि कचरा अशा दोन्ही पद्धतीने घाण करून ओढ्याचे अक्षरश: गटार करण्यात आले आहे. गावात सगळीकडे भूमिगत गटारव्यवस्था झाली आहे तरीही अशा उघड्या जागेवर सांडपाणी सोडले जात असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

आता गावात नागरिकरणाने जोर धरला आहे. त्यामुळे टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. अनेक इमारत अगदी एकमेकांना चिकटून बांधल्या गेल्या असल्याने आता यात नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले आहे, अशी तक्रार गावकरी करतात. गावातील जागेवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याने याचा त्रास आम्हाला होतो, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवली.

गावाला महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. ज्या टाकीत गावासाठी पाणी साठवले जाते, त्या टाकीची अवस्था दयनीय झाली असून आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. त्यातच जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने दूषित पाणी प्यावे लागत आहे.

गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण गावात अजून कमी आहे. ज्या वेळेला सोसायट्या वाढतील तेव्हा संसाधनांवर ताण पडेल. त्यामुळे विलिनीकरणातून आम्हाला ठोस काही तरी मिळायला हवे, अशी मागणी गावकऱ्यांची आहे.

*कोट*

गेल्या दहा वर्षांत गावाचा वेगाने विस्तार झाला. मात्र उद्यान, क्रीडांगण तर सोडाच, साधे सार्वजनिक शौचालयही गावात नाही. महापालिकेने ही त्रुटी दूर करावी.

संजय जाधव, नोकरदार.

..............

पर्यटकांच्या दृष्टीने जिल्ह्यात आमचं गाव महत्त्वाचे असून त्यासाठी पायाभूत सुविधा व वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असणे गरजेचे आहे. महापालिकेने त्यासंबंधी योग्य पावले उचलावीत.

-प्रमोद तेलावडे

नागरिक

................

फोटो ओळ

खडकवासला ग्रामपंचायत कार्यालयांच्या अगदी समोरच भरणाऱ्या भाजी मंडईमुळे वाहतूककोंडी होते.