शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

गर्दी वाढल्याने निवडणूक यंत्रणेचा बोजवारा

By admin | Updated: July 18, 2015 04:17 IST

जिल्ह्यात ७०३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी इच्छुक उमेदवारांनी प्रचंड गर्दी केल्याने निवडणूक

पुणे : जिल्ह्यात ७०३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी इच्छुक उमेदवारांनी प्रचंड गर्दी केल्याने निवडणूक यंत्रणेचा चांगलाच बोजवारा उडाला. एका अधिकाऱ्याकडे दोन ग्रामपंचयातींची जबाबदारी, अपुरे प्रशिक्षण, स्वीकारलेले अर्ज ठेवण्यासाठी व्यवस्था नाही, अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य, आणि अपुऱ्या सुविधा, पोलीस बंदोबस्ताचा अभाव, यामुळे कर्मचाऱ्यांसह येणाऱ्या उमेदवारांची प्रचंड गैरसोय झाली. हे चित्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी होते.राज्य निवडणूक आयोगाने या वेळी प्रथमच लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर ग्रामपंचायत निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या वेळी प्रथमच निवडणुकीसाठीचे अर्ज आॅनलाईन पद्घतीने भरण्यात आले, पण ही प्रक्रिया केवळ नावापुरती असल्याचे स्पष्ट झाले असून, आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर पुन्हा सर्व कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देखील अर्ज दाखल करावे लागत आहेत. पुणे जिल्ह्यात ७०३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि १९६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी १३ जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. परंतु पहिल्याच दिवशी १३ तारीख पाखली सोहळा, १५, १६ जुलै रोजी आलेली अमावास्या यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे टाळले. यामुळे चार दिवसांत हेवील तालुक्यात ५८ ग्रामपंचायतींसाठी केवळ १९९ अर्ज दाखल झाले. परंतु शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकाच वेळी उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह शिवाजीनगर येथील शासकीय धान्य गोदामात प्रचंड गर्दी केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करताना केवळ पाच व्यक्तींना प्रवेश देण्यात येतो, परंतु येथे एका उमेदवाराबरोबर दहा ते पंधरापेक्षा अधिक कार्यकर्ते निवडणूक अधिकाऱ्याला गराडाच घालत होते. (प्रतिनिधी)तहसीलदार फिरकलेच नाहीहवेली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी धान्य गोदामात अर्ज स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे. या निवडणुकीत तालुक्याची प्रमुख जबाबदारी संबंधित तहसीलदारांची आहे. पंरतु हवेली तालुक्यात शुक्रवारी एवढी गर्दी व गोंधळाची परस्थिती निर्माण होऊनदेखील दिवसभरात ते गोदामाकडे फिरकले नाहीत.