शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कृत्रिम पावसाचा प्रयोग आजपासून

By admin | Updated: September 16, 2015 02:48 IST

पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा

पुणे : पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यात कृत्रिम पावसासाठी अनुकूल ढग उपलब्ध असल्याने या प्रयोगाचा प्रारंभ बुधवारपासून (दि. १६) पुण्यातील लोहगाव विमानतळावरून होणार आहे.राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत हा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात येईल. याबाबत विभागाचे प्रमुख सुहास दिवसे यांनी सांगितले, की मराठवाड्यात गेला महिनाभर हा प्रयोग सुरू होता. आता पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमान उड्डाणे करून हा कृत्रिम पाऊस पाडणार आहे. हे विमानतळ लष्कराचा हवाईतळ आहे. हवाईदल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या प्रयोगासाठी विमान उड्डाण व लँडिंगसाठी परवानगी दिली आहे. लोहगाव विमानतळावरून पश्चिम घाट क्षेत्रात पाऊस पाडण्याचे नियोजन आहे. धरणांतील कमी साठा व पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता पाणलोट क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. भीमा उपखोऱ्यात २५ धरणे असून, आजपर्यंत या धरणांत ८५़६४ टक्के पाणीसाठा आहे़ हा क्षमतेपेक्षा केवळ ४०़०६ टक्के आहे़ गतवर्षी तो ९७़८६ टक्के इतका होता़ कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला, तर त्यातून धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे़ मराठवाड्यात आॅगस्टच्या पहिल्या व शेवटच्या आठवड्यात केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला चांगले यश मिळाले असून, अनेक ठिकाणी पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत़ पश्चिम महाराष्ट्रात येत्या १८ सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस वाढणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे़ त्यामुळे पुणे व परिसरात होणाऱ्या या प्रयोगाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)