शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

उरुळी कांचन ग्रामपंचायतीची ओढे-नाले सफाईची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST

मागील वर्षी पावसाळ्यामध्ये उरुळी कांचन गावात असणाऱ्या दोन्ही ओढ्यांना दोनवेळा सुमारे १५-२० वर्षांनंतर मोठा पूर आल्याने संपूर्ण गावांमध्ये पाणी ...

मागील वर्षी पावसाळ्यामध्ये उरुळी कांचन गावात असणाऱ्या दोन्ही ओढ्यांना दोनवेळा सुमारे १५-२० वर्षांनंतर मोठा पूर आल्याने संपूर्ण गावांमध्ये पाणी शिरून गावातील जनजीवन सुमारे २४ तासांहून जास्त वेळ विस्कळीत झाले होते.याला कारणीभूत असलेला नाल्या मधील गाळ व घाण आणि झाडेझुडपे ही वेळेत न काढली गेल्यामुळे मागील वर्षी मोठा अनर्थ घडला होता. याचे भान ठेवून यावर्षी ग्रामपंचायतीने या ओढ्यांची व नाल्यांची साफसफाई करण्याची लगबग माॅन्सूनपूर्वीच सुरू केली आहे. ग्रामपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी, जेसीपी मशीन, ट्रॅक्टर, कचरा वाहतुकीच्या गाड्या या सगळ्या मशिनरी व वाहनांसहित उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपच्या सभासदांच्या सहकार्यातून यावेळी पावसाळ्यापूर्वीच ओढ्यांची व नाल्यांची साफ सफाई करून कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी सांगितले की, मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पावसाळ्या पूर्वीच उरुळी कांचन गावातून वाहत जाणारा ओढा साफ करून भविष्यातील पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे.

काम लवकर सुरू करण्यात यावे, अशा सूचना सरपंच संतोष कांचन व उपसरपंच संचिता कांचन यांनी सफाई कर्मचारी व ग्राम विकास अधिकारी यांना दिल्या होत्या.

उरुळी कांचन गावातील ओढ्यावरील पुलाजवळ घोडा साफसफाई करण्याचे काम चालू असताना.