शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

उरुळी कांचनची पाणी योजना मंत्रालयात अडकली

By admin | Updated: May 23, 2014 05:05 IST

पुणे शहरापासून जवळ असणार्‍या उरुळी कांचन शहरासाठी ग्रामपंचायतीने राज्य शासनाला ५४ कोटींची पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १३ महिन्यांपूर्वी प्रस्तावित केली आहे

उरुळी कांचन : पुणे शहरापासून जवळ असणार्‍या उरुळी कांचन शहरासाठी ग्रामपंचायतीने राज्य शासनाला ५४ कोटींची पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १३ महिन्यांपूर्वी प्रस्तावित केली आहे. मात्र, या फायली मंत्रालयात पडून आहेत. उरुळी कांचन शहराच्या २०११ च्या जनगणनेनुसार, ३० हजार लोकसंख्या आहे. तसेच, दररोज उरुळी कांचन शहरात येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशी व नागरिकांची ३५ हजार संख्या असून, खडकवासल्याहून येणार्‍या कॅनॉलवर पाणी योजना अवलंबून आहे. कॅनॉलला पाणी असेल, तरच उरुळी कांचन शहराला दररोज पाणीपुरवठा होतो. कॅनॉलचे पाणी बंद झाल्यास नाना कांचन यांच्या खासगी विहिरीतून, विलास कारभारी कांचन, तसेच महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या विहिरीतून पाणी घेण्यात येते. पाणीटंचाईच्या काळात गायकवाड वडेवाले हे त्यांच्या विंधन विहिरीचे पाणी कोणताही मोबदला न घेता गावासाठी सहकार्य करत आहेत. भविष्यातील झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येचा विचार करता ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे ५४ कोटी रुपयांची पाणीयोजना प्रस्तावित केली. यासाठी राममंदिर ट्रस्टने ५ एकर जागा ग्रामपंचायतीसाठी दिली आहे. गावातील पाणी योजनेचा सॅटेलाईट सर्व्हे करण्यात आला असून, अस्तित्वात असणार्‍या पाण्याच्या टाक्या, आवश्यक लागणार्‍या टाक्या, फिल्टर प्लँट, पाईप लाईन या बाबींचा सर्व्हे झाला आहे. मात्र, फाईल सध्या पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांच्या विभागाकडे पडून आहे. ही योजना लवकरात लवकर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)