शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

शहरातील नागरिक लसीकरणासाठी ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५५ हजार लसीकरण डोस उपलब्ध झाल्याची बातमी पसरताच बुधवारी पुणे आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५५ हजार लसीकरण डोस उपलब्ध झाल्याची बातमी पसरताच बुधवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाकडे धाव घेतली. शहरामधून नागरिकांची वाहने लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आल्याने अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. गावकऱ्यांनी अशा पद्धतीच्या लसीकरणावर आक्षेप नोंदवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात देखील लसीकरण डोसचा तुटवडा निर्माण झाल्याने लोक लसीकरणासाठी या सेंटरवरून त्या सेंटरवर वणवण फिरत आहेत. कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण सुरू झाले आहे. या गटातील लसीकरणासाठी नोंदणी करून उपलब्ध लसीकरणाचे ठिकाण नागरिकांना निश्चित करून दिली जाते. गेल्या दोन दिवसापासून या वयोगटातील लसीकरणाच्या मोहिमेसाठी होणाऱ्या नोंदणीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने एक-दोन मिनिटातच कोठा पूर्ण होतो अशी स्थिती आहे.

बुधवारी (दि.५) रोजी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मधील अनेक नागरिकांनी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राची निवड केली. त्यामुळे जिल्ह्यातील जुन्नर, वेल्हे, मुळशी, खेड, शिरूर, बोर, पुरंदर या तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर पुण्यातील नागरिकांची गर्दी उसळली. त्यास ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला. परंतु लसीकरणासाठी नावनोंदणी आणि केंद्र निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला असल्याने ठरलेल्या नोंदणी नुसार लसीकरण केले.

१८ ते ४० वयोगटातील लसीकरण आतील नोंदणी अगोदर झाल्याने काही तासांतच लसीकरणाचा कोटा पूर्ण झाला दुपारनंतर ही केंद्र बंद केली. ग्रामीण भागातील या गटातील नागरिकांना लस न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. ग्रामीण भागातील केंद्रही ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरू ठेवावीत आणि शहरातील केंद्रांवर शहर आणि परिसरातील नागरिकांना तर लसीकरण करावे म्हणजे गोंधळ होणार नाही अशी भूमिका अनेक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.