शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:10 IST

कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आले असल्याने कुरकुंभ ...

कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आले असल्याने कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रकल्पातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असून महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर आपली हतबलता दर्शवली आहे. तर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे दूषित पाणी आमचे नाही असं सांगून हात झटकत आहे. तसेच रस्ते विकास महामंडळाने देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्या या प्रदूषित पाण्याला कोणीच वाली नसल्याने या समस्येमुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा विषय गेली दोन दशकांपासून प्रलंबित असून, याबाबत आजवर अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत. मात्र या सर्व बैठका उद्योजकधार्जिण्या असल्याचे दिसून आले आहे. विविध स्तरांवर आदेश मिळूनदेखील उद्योजक या आदेशांना भीक न घालता राजरोसपणे दूषित पाणी उघड्यावर सोडून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. आत्तापर्यंत जमिनीत मुरणारे व ओढ्या-नाल्यांच्या माध्यमातून वाहणारे दूषित पाणी आता थेट कुरकुंभकरांच्या दारात पोहोचणार आहे. याबाबत कोणताच पदाधिकारी बोलण्यास तयार नसून त्यामुळे उद्योजकांचे फोफावत आहे.

दरम्यान, सुरुवातीला याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे यांनी या पाण्याचा नमुना तपासणीसाठी घेतला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पाण्याची पाइपलाइन लिकेज असल्याचा दावा केला आहे तर औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी विजय पेटकर यांनी हा दावा खोटा असून, पाण्याच्या लाईन लिकेज नाहीत, मात्र प्रदूषण मंडळ आपली जबाबदारी झटकून दुसऱ्यांवर आरोप करीत आहेत असे सांगितले आहे. तसेच ज्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसरातून हे दूषित पाणी सर्रासपणे बाहेर येत आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे पाणी आमचे नसून उलट आम्हीच हे पाणी कोणाचे हे शोधून काढण्यासाठी प्रदूषण मंडळ व औद्योगिक विकास महामंडळ यांना पत्र लिहिले असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र याबाबत लवकरच उपाययोजना करणार असल्याचे पेटकर यांनी मान्य केले आहे.

पोलिसांनी हस्तक्षेप करावा____एरवी उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून बैठका आयोजित केल्या जातात. उद्योजकांना उद्योगात येणाऱ्या स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी सर्रास पोलीस बळाचा वापर देखील केला जातो. मात्र उद्योजकांकडून सर्वसामान्य ग्रामस्थांच्या जिवाशी होणारा खेळ व त्यांच्या तक्रारी कोणीच ऐकून घेत नसल्याच्या अडचणीला कोणीच सोडवताना दिसून येत नसल्याने कायदा व सुरक्षेच्या रक्षणकर्त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थ करीत आहेत.