शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:10 IST

कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आले असल्याने कुरकुंभ ...

कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आले असल्याने कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रकल्पातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असून महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर आपली हतबलता दर्शवली आहे. तर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे दूषित पाणी आमचे नाही असं सांगून हात झटकत आहे. तसेच रस्ते विकास महामंडळाने देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्या या प्रदूषित पाण्याला कोणीच वाली नसल्याने या समस्येमुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा विषय गेली दोन दशकांपासून प्रलंबित असून, याबाबत आजवर अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत. मात्र या सर्व बैठका उद्योजकधार्जिण्या असल्याचे दिसून आले आहे. विविध स्तरांवर आदेश मिळूनदेखील उद्योजक या आदेशांना भीक न घालता राजरोसपणे दूषित पाणी उघड्यावर सोडून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. आत्तापर्यंत जमिनीत मुरणारे व ओढ्या-नाल्यांच्या माध्यमातून वाहणारे दूषित पाणी आता थेट कुरकुंभकरांच्या दारात पोहोचणार आहे. याबाबत कोणताच पदाधिकारी बोलण्यास तयार नसून त्यामुळे उद्योजकांचे फोफावत आहे.

दरम्यान, सुरुवातीला याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे यांनी या पाण्याचा नमुना तपासणीसाठी घेतला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची पाण्याची पाइपलाइन लिकेज असल्याचा दावा केला आहे तर औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी विजय पेटकर यांनी हा दावा खोटा असून, पाण्याच्या लाईन लिकेज नाहीत, मात्र प्रदूषण मंडळ आपली जबाबदारी झटकून दुसऱ्यांवर आरोप करीत आहेत असे सांगितले आहे. तसेच ज्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसरातून हे दूषित पाणी सर्रासपणे बाहेर येत आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे पाणी आमचे नसून उलट आम्हीच हे पाणी कोणाचे हे शोधून काढण्यासाठी प्रदूषण मंडळ व औद्योगिक विकास महामंडळ यांना पत्र लिहिले असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र याबाबत लवकरच उपाययोजना करणार असल्याचे पेटकर यांनी मान्य केले आहे.

पोलिसांनी हस्तक्षेप करावा____एरवी उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून बैठका आयोजित केल्या जातात. उद्योजकांना उद्योगात येणाऱ्या स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी सर्रास पोलीस बळाचा वापर देखील केला जातो. मात्र उद्योजकांकडून सर्वसामान्य ग्रामस्थांच्या जिवाशी होणारा खेळ व त्यांच्या तक्रारी कोणीच ऐकून घेत नसल्याच्या अडचणीला कोणीच सोडवताना दिसून येत नसल्याने कायदा व सुरक्षेच्या रक्षणकर्त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थ करीत आहेत.