या प्रकारामुळे ट्रकचालक मात्र वैतागले आहेत.
खेड-शिवापूर टोलनाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही बाजूस दोन वजनकाटे आहेत. टोल नाक्यावर माल वाहतूक करणारा ट्रक आला की त्या ट्रकला वजनकाट्यावर नेले जाते. त्या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त वजन असल्यास त्या प्रमाणात त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. मात्र पावतीव्यतिरिक्त उरलेले जास्तीचे पैसे ट्रकचालकाला परत दिले जात नाहीत. या प्रकारामुळे परराज्यातील ट्रकचालक त्रस्त झाले आहेत. या प्रकारांमुळे अनेकदा या ट्रकचालकांच्या जवळ पैसे उरत नाहीत. गाडीतील माल संबंधित ठिकाणी वेळेत पोचवला जाणे जिकिरीचे होऊन जाते. अशा अनेक अडचणी त्याच्या समोर उभ्या राहतात.
ट्रकचालकांच्या लुटीचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. टोल नाक्यावर ट्रकचालकांची सुरू असलेली लूट थांबवली पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
बनावट टोलपावत्याप्रकरणी आणखीन ५ जणांवर गुन्हा दाखल, आरोपींची संख्या झाली १२
चौकट
"बनावट टोल पावती प्रकरणात अजून काही आरोपी वाढले असून एकूण सात आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून तपास योग्य रीतीने चालू आहे, अशी माहिती राजगड पोलिसांकडून मिळाली.