शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पुणे पोलीस दलातील दोघांनी सर केले ’माऊंट हनुमान तिब्बा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

पुणे : कामावर सायकलवर जायचे आणि सिंहगड किल्ला चढण्याचा सराव करायचा. त्यामुळे त्यांचा फिटनेस चांगला झाला आणि म्हणूनच हिमाचल ...

पुणे : कामावर सायकलवर जायचे आणि सिंहगड किल्ला चढण्याचा सराव करायचा. त्यामुळे त्यांचा फिटनेस चांगला झाला आणि म्हणूनच हिमाचल प्रदेशामधील धवलाधार पर्वतरांगेतील सर्वात उंच व अतिशय अवघड मानल्या जाणारे ‘माऊंट हनुमान तिब्बा’ त्यांनी सहजरीत्या ‘सर’ केले. ते आहेत पुणे पोलीस दलातील नाईक स्वप्नील गरड. त्यांच्यासोबत रफीक शेख व शरद कुलकर्णी यांनीदेखील सहभाग घेतला.

५९८२ मीटर उंचीचे हिमशिखर माऊंट हनुमान तिब्बा मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील ६ गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता. त्यात महाराष्ट्र पोलीस दलातील दोघांचा समावेश होता. या माेहिमेसाठी सुरुवात २४ जून २०२१ रोजी मनाली येथून झाली. १ जुलै २०२१ रोजी १०.४५ वाजता स्वप्निल गरड, शरद कुलकर्णी व रफीक शेख यांनी माऊंट हनुमान तिब्बा हे शिखर सर केले. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शरद कुलकर्णी आहेत. त्यांचे वय ५९ आहे. या मोहिमेमध्ये दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्था, पुणेचे गिर्यारोहक पोलीस नाईक स्वप्निल आदिनाथ गरड यांनी प्रयत्न केले.

पहिल्यांदाच पोलीस दलातील दोघांनी शिखर सर केल्याने त्यांचा विविध संस्थांकडून सत्कार करण्यात येत आहे. गरड हे नियमित सायकल चालवतात. ते घरून सायकलवरच ऑफिसला जातात. त्याद्वारे सायकल चालविण्याची जनजागृती ते करतात. पर्यावरण वाचवा हा संदेश देत असतात. स्वप्निल गरड यांचा जगातील सर्वांत उंच माउंट एव्हरेस्ट हे शिखर पुढील वर्षी सर करण्याचा मानस आहे.

————————————-

स्वप्निल गरड म्हणाले की, “मी गेले दोन वर्षांपासून कामावर ये-जात करत आहे. तसेच दैनंदिन कामकाजासाठी सायकलचाच वापर करतो. त्यामुळे माझी तब्येत फिट आहे. आतापर्यंत सुमारे १० हजारहून अधिक प्रवास सायकलवरून केला आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी चांगली झाली. राजे शिवाजी क्लायबिंग वॉल, शिवाजीनगर येथे रोज सराव करत होतो. मोहिमेला जाण्याअगोदर एक महिना आधीपासून रोज सकाळी साडेतीन वाजता घरातून सिंहगडावर जायचो. पाठीवर २० ते २२ किलो वजन घेऊन ५५ मिनिटांमध्ये किल्ला सर करायचो आणि ४५ मिनिटांमध्ये उतरायचो.’’

-----------------------

एव्हरेस्टवीर रफीक शेख म्हणाले की, “माऊंट हनुमान तिब्बा या शिखरावरील तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड असा टप्पा माऊंट एव्हरेस्टदेखील नसल्याने ही मोहीम अवघड होती व निसर्गाची साथ लाभल्याने ही मोहीम यशस्वी झाली.’’

--------------------------