शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तास पाणी कधी?

By admin | Updated: May 31, 2016 02:04 IST

उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने

पिंपरी : उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने, तसेच भामा-आसखेड, आंध्रा धरणामधून दोनशे दलघमी पाणी आणण्याचे नियोजन अद्यापही कागदोपत्रीच असल्याने चोवीस तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण कधी होणार आहे? केंद्र शासनाच्या वतीने सार्वजनिक सुविधा सक्षमीकरण, सुविधांचे सेवा पातळ्यांचे मानांकन निश्चित करण्याचे धोरण आखले गेले. त्यानुसार पुण्यापाठोपाठ जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) पिंपरी-चिंचवड शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले. त्यातून २४ तास पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना पुढे आली. शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी केले. शहरास ३७८ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक होते. त्यानुसार २००८मध्ये बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आराखडा तयार झाला. गेल्या आठ वर्षांत हा आराखडा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्षही शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे. शहरात कुटुंबांची एकूण संख्या ४ लाख ३० हजार आहे. प्रतिमाणशी प्रतिदिन १८० लिटर पाणी पुरविले जाते. त्यामुळे दिवसाला ३१ कोटी १२ लाख ९१ हजार १०० लिटर पाणी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन काळाची गरज आहे. केलेले नियोजन अंमलात आणण्याची गरज आहे.बंदिस्त जलवाहिनी झाल्यास शेतीला पाणी मिळणार नाही, अशी भावना झाल्याने मावळातील शेतकऱ्यांनी विरोध केला. आंदोलनात तीन शेतकरी शहीद झाले. शेतकऱ्यांची बाजू समजून न घेतल्याने आंदोलनास हिंसक वळण मिळाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने भामा आसखेड, आंद्रा धरणामधून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. आंध्रा धरणातून चाळीस दलघमीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. मावळसारखाच विरोध या भागातही होऊ लागला आहे. शेतीचे पाणी नेऊ नका, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी सर्वेक्षण नुकतेच बंद पाडले. तसेच यासाठी अडीचशे कोटी सरकारने माफ करावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे. यमुनानगर, निगडी परिसरात चोवीस तास पाण्याच्या नियोजनाचा प्रयोग २०१२-१३मध्ये राबविण्यात आला. या भागातील सुमारे पंधरा हजार नळजोडांसाठी ही योजना राबविण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांत शहरात २४ तास पाणी तर दूरच. मात्र, एक वेळही पुरसे पाणी देण्यात महापालिकेला यश आलेले नाही. (प्रतिनिधी)