शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

चोवीस तास पाणी कधी?

By admin | Updated: May 31, 2016 02:04 IST

उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने

पिंपरी : उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने, तसेच भामा-आसखेड, आंध्रा धरणामधून दोनशे दलघमी पाणी आणण्याचे नियोजन अद्यापही कागदोपत्रीच असल्याने चोवीस तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण कधी होणार आहे? केंद्र शासनाच्या वतीने सार्वजनिक सुविधा सक्षमीकरण, सुविधांचे सेवा पातळ्यांचे मानांकन निश्चित करण्याचे धोरण आखले गेले. त्यानुसार पुण्यापाठोपाठ जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) पिंपरी-चिंचवड शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले. त्यातून २४ तास पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना पुढे आली. शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी केले. शहरास ३७८ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक होते. त्यानुसार २००८मध्ये बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आराखडा तयार झाला. गेल्या आठ वर्षांत हा आराखडा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्षही शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे. शहरात कुटुंबांची एकूण संख्या ४ लाख ३० हजार आहे. प्रतिमाणशी प्रतिदिन १८० लिटर पाणी पुरविले जाते. त्यामुळे दिवसाला ३१ कोटी १२ लाख ९१ हजार १०० लिटर पाणी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन काळाची गरज आहे. केलेले नियोजन अंमलात आणण्याची गरज आहे.बंदिस्त जलवाहिनी झाल्यास शेतीला पाणी मिळणार नाही, अशी भावना झाल्याने मावळातील शेतकऱ्यांनी विरोध केला. आंदोलनात तीन शेतकरी शहीद झाले. शेतकऱ्यांची बाजू समजून न घेतल्याने आंदोलनास हिंसक वळण मिळाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने भामा आसखेड, आंद्रा धरणामधून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. आंध्रा धरणातून चाळीस दलघमीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. मावळसारखाच विरोध या भागातही होऊ लागला आहे. शेतीचे पाणी नेऊ नका, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी सर्वेक्षण नुकतेच बंद पाडले. तसेच यासाठी अडीचशे कोटी सरकारने माफ करावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे. यमुनानगर, निगडी परिसरात चोवीस तास पाण्याच्या नियोजनाचा प्रयोग २०१२-१३मध्ये राबविण्यात आला. या भागातील सुमारे पंधरा हजार नळजोडांसाठी ही योजना राबविण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांत शहरात २४ तास पाणी तर दूरच. मात्र, एक वेळही पुरसे पाणी देण्यात महापालिकेला यश आलेले नाही. (प्रतिनिधी)