शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

बारावीच्या निकालाचे सूत्र ठरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST

पुणे : कोरोनामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बारावीचा निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर ...

पुणे : कोरोनामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बारावीचा निकाल कोणत्या सूत्रानुसार जाहीर करावा, हे अद्याप ठरलेले नाहीत. राज्य शासनाकडून अध्यादेश प्रसिद्ध केल्यानंतरच शिक्षण विभागाकडून निकालाची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभाग अध्यादेशाची वाट पाहत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

राज्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने सुद्धा बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, कोणत्याही बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र जाहीर केले नाही. सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या सूत्राचा अवलंब राज्य मंडळाकडून केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ अंतर्गत मूल्यमापनावर बारावीचा निकाल जाहीर करणे उचित ठरणार नाही. बारावीच्या गुणांवर पदवी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असते. त्यामुळे बारावीसाठी कोणत्या मूल्यमापनाचा अवलंब केला जातो, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीच्या निकालाचा आराखडा व वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात मुख्याध्यापकांची कर्तव्ये तसेच नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी परीक्षार्थी आदी विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावेत, यासंदर्भातील सविस्तर सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी राज्य मंडळाला बरीच तयारी करावी लागली. बारावीचा निकाल तयार करण्यासाठीसुद्धा याच पद्धतीने आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यामुळे इयत्ता बारावीचा निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.