शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

देशात खरे बोलणे हा गुन्हा ठरतोय

By admin | Updated: March 7, 2016 02:04 IST

न्यायासाठी जर सर्वसामान्य माणसाने आवाज उठविला तर त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. मग माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न पडतो.

पुणे : न्यायासाठी जर सर्वसामान्य माणसाने आवाज उठविला तर त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. मग माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे हा एक प्रकारे भारताच्या संविधानावर हल्ला झाला आहे. त्यामुळे खरे बोलणे हाच गुन्हा झाला आहे. याला रोखण्यासाठी माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे संघटन झालेच तर परिवर्तन होईल, असे मत राजस्थानमध्ये शेतकरी व मजुरांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते निखिल डे यांनी व्यक्त केले.सजग नागरिक मंचाच्या वतीने सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार मुंबई येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना डे यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी डे बोलत होते. आयएमडीआर सभागृह हा कार्यक्रम झाला. पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख रक्कम असे होते. या पुरस्काराची रक्कम गलगली यांनी नाम फाउंडेशनला देणार असल्याचे सांगितले. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी उपस्थित होते.डे म्हणाले, ‘‘देशातील सगळ्यात मोठा ताकदवान गट माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आहे. भ्रष्टाचार, अफरातफरी याला रोखण्यासाठी माहिती अधिकाराचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक व्यक्ती या कायद्यामार्फत त्यांचे हक्क जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहे. आपल्या हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी एकत्र येऊन जनआंदोलन केले तरच बदल होईल. माहिती अधिकाराचा पुढचा टप्पा म्हणून माहिती अधिकार २ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे.’’ सरकारी अधिकाऱ्यांचे काम काय आहे, याची माहिती सरकारला विचारली पाहिजे. माहिती मिळाली नाही तर कारवाई झाली पाहिजे. भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीची एका महिन्यात माहिती काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला नोकरीवरून काढून टाकले पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांची मुलेही सरकारी शाळेत शिकली पाहिजे, अशी विनंती शासनाकडे केली असल्याचे निखिल डे म्हणाले. (प्रतिनिधी)