शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

देशात खरे बोलणे हा गुन्हा ठरतोय

By admin | Updated: March 7, 2016 02:04 IST

न्यायासाठी जर सर्वसामान्य माणसाने आवाज उठविला तर त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. मग माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न पडतो.

पुणे : न्यायासाठी जर सर्वसामान्य माणसाने आवाज उठविला तर त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. मग माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे हा एक प्रकारे भारताच्या संविधानावर हल्ला झाला आहे. त्यामुळे खरे बोलणे हाच गुन्हा झाला आहे. याला रोखण्यासाठी माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे संघटन झालेच तर परिवर्तन होईल, असे मत राजस्थानमध्ये शेतकरी व मजुरांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते निखिल डे यांनी व्यक्त केले.सजग नागरिक मंचाच्या वतीने सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार मुंबई येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना डे यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी डे बोलत होते. आयएमडीआर सभागृह हा कार्यक्रम झाला. पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख रक्कम असे होते. या पुरस्काराची रक्कम गलगली यांनी नाम फाउंडेशनला देणार असल्याचे सांगितले. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी उपस्थित होते.डे म्हणाले, ‘‘देशातील सगळ्यात मोठा ताकदवान गट माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आहे. भ्रष्टाचार, अफरातफरी याला रोखण्यासाठी माहिती अधिकाराचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक व्यक्ती या कायद्यामार्फत त्यांचे हक्क जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहे. आपल्या हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी एकत्र येऊन जनआंदोलन केले तरच बदल होईल. माहिती अधिकाराचा पुढचा टप्पा म्हणून माहिती अधिकार २ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे.’’ सरकारी अधिकाऱ्यांचे काम काय आहे, याची माहिती सरकारला विचारली पाहिजे. माहिती मिळाली नाही तर कारवाई झाली पाहिजे. भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीची एका महिन्यात माहिती काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला नोकरीवरून काढून टाकले पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांची मुलेही सरकारी शाळेत शिकली पाहिजे, अशी विनंती शासनाकडे केली असल्याचे निखिल डे म्हणाले. (प्रतिनिधी)