शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

राज्यात ५३ आयसोलेशन कोचमध्ये ९६ रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच राज्यांत कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन कोचचा वापर झाला. स्थानिक प्रशासनाने मागणी करताच रेल्वेने तीन ...

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच राज्यांत कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन कोचचा वापर झाला. स्थानिक प्रशासनाने मागणी करताच रेल्वेने तीन शहरांत रेल्वे डब्यांची व्यवस्था केली. यात नंदुरबार, अजनी व पालघरचा समावेश आहे. जवळपास ५३ कोचचे आयसोलेशन कोचमध्ये रुपांतर करून ९६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. पैकी ७० रुग्ण आता घरी सुध्दा परतले. यात नंदुरबार येथील रुग्णांची संख्या अधिक आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यासह देशाची परिस्थिती गंभीर झाली. आजही रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. राज्यात सर्वात आधी नंदुरबार प्रशासनाने पश्चिम रेल्वे कडे आयसोलेशन कोचची मागणी केली. त्यानुसार पश्चिम रेल्वेने २१ आयसोलेशन कोच नंदुरबार साठी उपलब्ध करून दिले. त्याठिकाणी आतापर्यंत ९० रुग्णांवर उपचार झाले. पैकी ७० रुग्ण घरी परतले तर सद्य:स्थित २० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागकडे आयसोलेशन कोचची मागणी झाली. त्यानुसार ११ कोच तयार केले. येथे ६ रुग्णांवर उपचार झाले. तर पालघर प्रशासनाने सुद्धा रेल्वेकडे कोचची मागणी केली. त्यानुसार पश्चिम रेल्वेने दोन दिवसांपूर्वी पालघर प्रशासनाच्या ताब्यात २१ कोच दिले आहे. येत्या १ ते २ दिवसांत येते रुग्णांना दाखल केले जाईल, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.

चौकट

रेल्वेने तयार केले ९३२ बेड

नंदुरबार (२१), पालघर (२१) व अजनी (११) असे मिळून रेल्वेने ५३ कोचचा वापर केला. प्रत्येक डब्यांत १८ बेडची व्यवस्था केली. असे मिळून ९३२ बेडची व्यवस्था करण्यात आली.

चौकट

डबे तापू नये म्हणून

सध्या उन्हाळा सुरू असल्याने डबे चांगलेच तापातात. त्यामुळे आत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डब्यांतील तापमान कमी करण्याकरिता शक्कल लढवली. डब्यांच्या वरच्या बाजूस पोते अंथरून त्यांवर पाण्याची धार सोडली. डब्यांच्या खिडकी समोर कुलर सुरू केले. तसेच ज्या ठिकाणी डबे ठेवण्यात आले त्या ठिकाणी मंडप मारला. परिणामी डब्यांतील तापमान कमी झाले.

कोट

नंदुरबार व पालघर येथे प्रत्येकी २१ आयसोलेशन कोच तयार केले. नंदुरबार मध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहे. पालघर मध्ये देखील स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार रुग्णांना दाखल केले जाईल. ज्या ज्या ठिकाणी कोच संदर्भात मागणी येईल त्या ठिकाणी आम्ही कोच उपलब्ध करून देऊ.

- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे, मुंबई