शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

कचऱ्यामुळे होतेय वाहतूककोंडी

By admin | Updated: October 15, 2016 05:40 IST

खराडीतील हॉटेल रॅडिसन चौकात सतत रस्त्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाली

चंदननगर : खराडीतील हॉटेल रॅडिसन चौकात सतत रस्त्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाली आहे. खराडीतील प्रभाग क्रमांक १९च्या मुख्य चौकात रस्त्यात कचरा गेल्या वर्षभरापासून टाकला जात आहे. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना, व्यावसायिकांना होत आहे. खराडीतील चौकातून चंदननगरला जाणाऱ्या मार्गावर रस्त्यात बेजबाबदार नागरिकांकडून रात्रीच्या वेळी हा कचरा टाकला जात आहे.या चौकात सततच्या वाहतूककोंडीमुळे दोन महिन्यांपूर्वी सिग्नल बसविण्यात आले आहेत. तरी सुद्धा याठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच चौकातून हडपसर, खराडी एमआयडीसी, आयटी पार्ककडे रस्ता जातो. त्यामुळे मोठी वाहतूक या रस्त्यावरून होत असते. बायपास ते हडपसर हा मुख्य रस्ता मोठा आहे. मात्र खराडी ते चंदननगर हा रस्ता केवळ तीसच फुटी असल्याकारणाने या रस्त्यावर मात्र कचरा टाकला जात आहे. तीस फुटाच्या रस्त्यात दहाहून अधिक फूट कचरा पडलेला असतो. त्यामुळे खराडी ते चंदननगरच्या बाजूच्या वाहनांना रस्ताच उरत नाही. त्यामुळे ती वाहने चुकीच्या व आडव्या तिडव्या पद्धतीने घातल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. वाहनचालकांत दररोज वाद होत आहेत. कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील कचरा मध्यरात्री टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता तो उचलला जाते. मात्र त्याठिकाणी स्वच्छता न केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याबाबत महापालिका आरोग्य विभागाला वारंवार कळवूनही पालिकेचे आरोग्य अधिकारी या तक्रारींची दखल घेत नसल्यामुळे चौकाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. या चौकात अतिशय सुंदर मोठे प्रशस्त रस्ते, थ्री स्टार, फाईव्ह स्टार पंचतारांकित हॉटेल आहेत. मात्र या कचराकुंडीमुळे चौकाची शोभा गेली आहे. तसेच पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले की दुर्गंधी असह्य होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कचरा उचलण्यासाठी जे मोठे ट्रक आहेत ते कमी असून, ५ बीआरसी, १७ घंटागाड्या, कंटेनर ठेवण्यासाठी ४ डीपी टेम्पो असून, यातील १७ घंटा गाड्या सतत नादुरुस्त असतात. दहा ते पंधरा वर्षांपूर्वीच्या या गाड्या असल्यामुळे नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे वडगावशेरी व खराडीतील कचरा नियोजन कोलमडले आहे.(वार्ताहर)