अतुल अप्पा कारंडे (वय २२, रा. सहजपूर, गौतमनगर, ता. दौंड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (दि.१७) दुपारी दोनच्या दरम्यान सोलापूर बाजूस जाणाऱ्या लेनवर यवतच्या हद्दीत घडला. अतुल हा रिलायन्स पेट्रोल पंपावर कामाला होता. बुधवारी दुपारी २ वाजता त्याची कामाची वेळ संपल्यानंतर दुसरा कामगार सागर लक्ष्मण कोल्हे हा अतुल कडून हिशोब व रीडिंग घेत असताना पंपावर डिझेल भरण्यासाठी इनोव्हा कार आली होती. त्या कारमध्ये ३ हजार ४६० रुपयांचे डिझेल भरल्यानंतर त्या कार चालकाने ५०० रुपये कमी देऊन तो सोलापूर बाजूकडे निघून गेला. म्हणून अतुल हा त्यांच्याकडील दुचाकी घेऊन कारच्या मागे गेला. मात्र यवत गावाच्या हद्दीत त्याची दुचाकी ट्रॅक्टरला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
चौकट :-
असेही दुर्दैव
पेट्रोल पंपावर काम करणारा सहजपूर येथील अतुल गरीब कुटुंबातील युवक होता. डिझेल भरलेले पाचशे रुपये कमी आले म्हणून तातडीने तो त्याच्या दुचाकीवरून इनोव्हा कारच्या मागे गेला. मात्र, तो पुढे गेल्यानंतर पंपावरील दुसऱ्या कामगाराने पैसे परत मोजले असता डिझेल भरलेली रक्कम बरोबर होती. हे सांगण्यासाठी दुसरे कामगार अतुल याच्या मागे गेले मात्र काही अंतरावरच काळाने घाला घातला होता. अतुल त्याच्या आयुष्यातील शेवटच्या घटका मोजत रक्तबंबाळ अवस्थेत महामार्गावर पडला होता. त्याला इतर कर्मचाऱ्यांनी यवत ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र उपचार होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
फोटो