शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

स्मार्ट सिटीसाठी तगडे आव्हान

By admin | Updated: December 2, 2015 04:15 IST

केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशभरातून २० शहरांची निवड करण्यात येणार होती; मात्र आता केवळ ८ ते १० शहरे पहिल्या टप्प्यासाठी निवडण्याचा

पुणे : केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशभरातून २० शहरांची निवड करण्यात येणार होती; मात्र आता केवळ ८ ते १० शहरे पहिल्या टप्प्यासाठी निवडण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. निवडण्यात येणाऱ्या शहरांची संख्या अचानक निम्म्याने कमी झाल्याने, पहिल्या टप्प्यात समावेशासाठी पुण्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. केंद्र शासनाकडे पाठविण्याचा स्मार्ट आराखडा तयार झाला असून, उद्या बुधवारी तो स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे.स्मार्ट सिटीचा प्रस्ताव महापालिकेला राज्य शासनामार्फत १५ डिसेंबरच्या आत केंद्र शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे. या प्रस्तावाला स्थायी समिती व मुख्य सभेची मान्यता त्यापूर्वी घ्यावी लागणार असल्याने खूपच कमी वेळ हाती राहिला आहे. मंगळवारी स्थायी समितीसमोर हा आराखडा सादर केला जाणार आहे. वेळापत्रकानुसार पुढील मुख्य सभा १५ डिसेंबरला असल्याने, त्यापूर्वीच याला मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीनंतर स्मार्ट आराखड्याच्या मंजुरीसाठी विशेष सभा बोलविली जाणार आहे. स्थायी मंजुरीनंतर, तो प्रस्तावित आराखडा संकेतस्थळावर नागरिकांसाठी जाहीर केला जाणार आहे.महापालिकेने राबविलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ३ लाख ७ हजार कुटुंबांचा सहभाग घेऊन स्मार्ट सिटी कशी असावी, यासाठी अर्ज भरून दिले. त्यानुसार नागरिकांचा प्राधान्य क्रम महापालिकेकडून निश्चित करण्यात आला आहे. वाहतूक आणि दळणवळण, पाणी व मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व शाश्वत उपाय, सावधानता व सुरक्षा, ऊर्जा व वीजपुरवठा हे प्रमुख ६ विषय निवडण्यात आले होते. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न वाहतुकीचाच असल्याचे ३० टक्के नागरिकांनी नमूद केले आहे. पाणीपुरवठा व मलनि:सारण यास २५ टक्के जणांनी प्राधान्य दिले आहे. घनकचरा व्यवस्थापनास २२ टक्के, पर्यावरणास १२ टक्के, सुरक्षितेस ३ टक्के, ऊर्जा व वीजपुरवठ्यास २ टक्के नागरिकांनी प्राधान्य दिले आहे. नागरिकांनी पहिल्या टप्प्यामध्ये सुंदर व स्वच्छ पुण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले.नागरिकांना महत्त्वाचे वाटणारे प्रश्न लक्षात आल्यानंतर, आता त्यावर काय करता येईल, याचा सखोल पद्धतीने विचार करण्यात आला. वाहतूकप्रश्न, पाणीप्रश्न, कचराप्रश्न असे एक एक विषय घेऊन, त्यावर कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याचबरोबर तज्ज्ञांची मते जाणून त्याची उकल कशी करता येईल, याची मांडणी आराखड्यात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अथक प्रयत्नांनंतर आराखडा तयार आयुक्त कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा महिन्यांपासून स्मार्ट सिटी सेल व पालिकेतील इतर अधिकारी, कर्मचारी हा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यासाठी झटत होते. महापालिकेतील अधिकारी, तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्या शेकडो बैठका यासाठी घेण्यात आल्या. लाखो नागरिकांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेऊन, त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा, सूचना, शिफारशींवर आधारित असा हा आराखडा बनविण्यात आला आहे. स्थायीसमोर आज उलगडणारमहापालिका प्रशासनाने तयार केलेला स्मार्ट सिटीचा आराखडा आज स्थायी समितीच्या सदस्यांसमोर सादर केला जाईल. पर्यावरणपूरक, वाहतूक समस्यांची उकल करणारा, स्वच्छ व सुंदर पुण्यावर भर देणारा, असा हा आराखडा असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर स्मार्ट सिटीचा प्रस्तावित आराखडा नागरिकांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.मंजुरीसाठी फिल्डिंगस्मार्ट सिटी आराखडा केंद्र शासनाकडे मुदतीमध्ये सादर करण्यासाठी बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे.त्याकरिता आयुक्तकुणाल कुमार यांनी मंगळवारी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम व इतर सदस्यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली. स्मार्ट सिटी आराखड्याबरोबरच नदी सुधार प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्ती व सायकल एकात्मिक प्रकल्प, या ३ विषयांना मंजुरी देण्याची विनंती कुणाल कुमार यांनी केली.