शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

टोल बंद! प्रदूषणापासून मुक्तता!

By admin | Updated: June 15, 2015 06:00 IST

शिरूर-पुणे रस्त्यावर असणारा रांजणगावजवळील अनधिकृत टोलनाका, तसेच शिक्रापूर-चाकण हा टोलनाका बंद झाला तो केवळ माहिती अधिकार कायद्यामुळे.

प्रवीण गायकवाड, शिरूरशिरूर-पुणे रस्त्यावर असणारा रांजणगावजवळील अनधिकृत टोलनाका, तसेच शिक्रापूर-चाकण हा टोलनाका बंद झाला तो केवळ माहिती अधिकार कायद्यामुळे. याच कायद्यामुळे गेली दहा वर्षांत रांजणगाव औद्योगिक वसाहतीत प्रदूषण करणाऱ्या कारखान्यावर कारवाई झाली. पर्यावरणासंदर्भात असणाऱ्या नियम अटींची माहिती जनतेसमोर आली, तर जिल्हा परिषद शाळांना बोगस आयएसओ प्रमाणपत्र वाटपाचे बिंगही फुटले. माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी केला, तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात, हे उपरोक्त घटनांवरून सिद्ध होते.माहिती अधिकार कार्यकर्ते संजय पाचंगे यांनी माहिती अधिकाराच्या आधारे आपली सर्व आंदोलने यशस्वी केली. शिरूर-पुणे या ५५ किलोमीटर महामार्गावर पेरणेफाटा व रांजणगाव गणपती येथे टोलनाका उभारण्यात आले होते. वास्तविक पेरणेफाटा येथे टोल वसुली, तर रांजणगाव येथे चेकनाका, असे प्रावधान होते. पाचंगे यांनी मिळविलेल्या (माहिती अधिकार कायद्यांतर्गत) माहितीमुळे हा प्रकार उघडकीस आला. २००५ साली या दोन्ही टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली. २०१० पर्यंत दोन्ही ठिकाणी टोलवसुली सुरू होती. म्हणजेच पाच वर्षे उद्योजकाने रांजणगाव नाक्यावर अनधिकृतपणे टोलवसुली केली. या संदर्भात पाचंगे यांनी २०१० मध्ये आंदोलन छेडले. शासनाने त्या वेळी घाईने रांजणगावचा टोलनाका बंद करून टाकला. त्या वेळी माहिती अधिकारातून या रस्त्यावरील अपूर्ण कामांविषयी सविस्तर माहिती मिळाली. प्रमोद मोहळे यांनीही या कायद्याच्या आधारे माहिती मिळवून याचविषयी पाच वर्षे न्यायालयीन लढा दिला. अखेर मागील वर्षी टोल बंद करण्यात आला. शिक्रापूर-चाकण टोलनाक्याची मुदत २०१० सालीच संपली होती. मात्र, या टोलला मुदतवाढ देण्यात आली, ही बाबही माहिती अधिकारातून उघड झाली. यानंतर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे हा टोलही शासनाने बंद केला. २००० सालात रांजणगाव औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आली. विकासाच्या दृष्टीने औद्योगीकीकरणाचे स्वागत करण्यात आले. मात्र, एक-दोन वर्षांतच कारखान्याचे दूषित पाणी ढोक सांगवी गावच्याओढे, विहिरींमध्ये जाऊन पाण्याचे स्रोत खराब झाले. जमिनी नापिक झाल्या. प्रदूषण, तसेच पर्यावरणासंदर्भातील नियम अटींविषयी त्या वेळी पाचंगे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहिती मागविली. या माहितीच्या आधारे संबंधित कारखान्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यामुळे ज्या ठराविक कारखान्याचे दूषित पाणी ढोकसांगवीत सोडले जात होते. त्याला आळा बसला.कारखाने सांडपाण्यावर प्रक्रिया न करता एमआयडीसीच्या गटारीत सोडतात. एमआयडीसीदेखील त्या पाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच खाली ओढ्याला सोडते, हेदेखील माहिती आधिकारामुळे उघड झाले. या संदर्भात विविध विभागांचे पाणी दूषित असल्याबाबत अहवाल प्राप्त झाले आहेत. आणखी काही अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायती, तसेच अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्याचा बोगस प्रकार माहिती अधिकाराद्वारे उघड झाला. यासाठी लागणारा खर्च देण्याचे आदेश पं. स. गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राने देण्यात आला होता.