शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

टोल बंद! प्रदूषणापासून मुक्तता!

By admin | Updated: June 15, 2015 06:00 IST

शिरूर-पुणे रस्त्यावर असणारा रांजणगावजवळील अनधिकृत टोलनाका, तसेच शिक्रापूर-चाकण हा टोलनाका बंद झाला तो केवळ माहिती अधिकार कायद्यामुळे.

प्रवीण गायकवाड, शिरूरशिरूर-पुणे रस्त्यावर असणारा रांजणगावजवळील अनधिकृत टोलनाका, तसेच शिक्रापूर-चाकण हा टोलनाका बंद झाला तो केवळ माहिती अधिकार कायद्यामुळे. याच कायद्यामुळे गेली दहा वर्षांत रांजणगाव औद्योगिक वसाहतीत प्रदूषण करणाऱ्या कारखान्यावर कारवाई झाली. पर्यावरणासंदर्भात असणाऱ्या नियम अटींची माहिती जनतेसमोर आली, तर जिल्हा परिषद शाळांना बोगस आयएसओ प्रमाणपत्र वाटपाचे बिंगही फुटले. माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी केला, तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात, हे उपरोक्त घटनांवरून सिद्ध होते.माहिती अधिकार कार्यकर्ते संजय पाचंगे यांनी माहिती अधिकाराच्या आधारे आपली सर्व आंदोलने यशस्वी केली. शिरूर-पुणे या ५५ किलोमीटर महामार्गावर पेरणेफाटा व रांजणगाव गणपती येथे टोलनाका उभारण्यात आले होते. वास्तविक पेरणेफाटा येथे टोल वसुली, तर रांजणगाव येथे चेकनाका, असे प्रावधान होते. पाचंगे यांनी मिळविलेल्या (माहिती अधिकार कायद्यांतर्गत) माहितीमुळे हा प्रकार उघडकीस आला. २००५ साली या दोन्ही टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली. २०१० पर्यंत दोन्ही ठिकाणी टोलवसुली सुरू होती. म्हणजेच पाच वर्षे उद्योजकाने रांजणगाव नाक्यावर अनधिकृतपणे टोलवसुली केली. या संदर्भात पाचंगे यांनी २०१० मध्ये आंदोलन छेडले. शासनाने त्या वेळी घाईने रांजणगावचा टोलनाका बंद करून टाकला. त्या वेळी माहिती अधिकारातून या रस्त्यावरील अपूर्ण कामांविषयी सविस्तर माहिती मिळाली. प्रमोद मोहळे यांनीही या कायद्याच्या आधारे माहिती मिळवून याचविषयी पाच वर्षे न्यायालयीन लढा दिला. अखेर मागील वर्षी टोल बंद करण्यात आला. शिक्रापूर-चाकण टोलनाक्याची मुदत २०१० सालीच संपली होती. मात्र, या टोलला मुदतवाढ देण्यात आली, ही बाबही माहिती अधिकारातून उघड झाली. यानंतर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे हा टोलही शासनाने बंद केला. २००० सालात रांजणगाव औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आली. विकासाच्या दृष्टीने औद्योगीकीकरणाचे स्वागत करण्यात आले. मात्र, एक-दोन वर्षांतच कारखान्याचे दूषित पाणी ढोक सांगवी गावच्याओढे, विहिरींमध्ये जाऊन पाण्याचे स्रोत खराब झाले. जमिनी नापिक झाल्या. प्रदूषण, तसेच पर्यावरणासंदर्भातील नियम अटींविषयी त्या वेळी पाचंगे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहिती मागविली. या माहितीच्या आधारे संबंधित कारखान्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यामुळे ज्या ठराविक कारखान्याचे दूषित पाणी ढोकसांगवीत सोडले जात होते. त्याला आळा बसला.कारखाने सांडपाण्यावर प्रक्रिया न करता एमआयडीसीच्या गटारीत सोडतात. एमआयडीसीदेखील त्या पाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच खाली ओढ्याला सोडते, हेदेखील माहिती आधिकारामुळे उघड झाले. या संदर्भात विविध विभागांचे पाणी दूषित असल्याबाबत अहवाल प्राप्त झाले आहेत. आणखी काही अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायती, तसेच अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्याचा बोगस प्रकार माहिती अधिकाराद्वारे उघड झाला. यासाठी लागणारा खर्च देण्याचे आदेश पं. स. गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राने देण्यात आला होता.