शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

टोल भरूनही मरण ‘स्वस्त’

By admin | Updated: January 25, 2017 01:53 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा दिवसेंदिवस असुरक्षित प्रवासाचा एक्सप्रेस महामार्ग बनला असल्याने या मार्गावरून प्रवास करताना

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा दिवसेंदिवस असुरक्षित प्रवासाचा एक्सप्रेस महामार्ग बनला असल्याने या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. कोणती गाडी कोठून येईल व अपघात होईल याचा या मार्गावर नेम नसल्याने द्रुतगती महामार्गावर टोल देऊन असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. मागील १५ वर्षांपासून या मार्गावर हजारो अपघात झाले. यामध्ये कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मात्र हे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन असो वा या मार्गावर देखभाल दुरुस्ती पाहणारी आयआरबी कंपनी असो यांनी कसलीही ठोस पावले उचलली नसल्याने आज हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. मार्गावर सुरूअसलेल्या याच मृत्यूच्या व अपघातांच्या तांडवाने सिंधूताई सपकाळ यांचा राग अनावर झाला होता. कळंबोली ते किवळे असा ९१ किमी अंतराचा भारतातील हा पहिला द्रुतगती महामार्ग बनविण्यात आला. मात्र तो बनवितानाच काही मालमत्ता वाचविण्याच्या नादात लोणावळा, सिंहगड कॉलेज ते खोपोली फुडमॉलपर्यंत या मार्गाचा मूळ प्रस्ताव बाजूला ठेवत उड्डाणपूल व वेड्यावाकड्या वळणाचा तो बनविण्यात आल्याने व या मार्गावर घाटातील चढण तसेच उतार कायम ठेवण्यात आल्याने द्रुतगती मार्ग या संकल्पनेलाच छेद दिला गेला. या मार्गावर लेनच्या शिस्तीचे सर्रास उल्लंघन करत कोणतेही वाहन लेनमधून वेगमर्यादेच्या कित्येकपट जादा वेगाने पळवली जात असल्याने अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, यावर कोणाचेही नियंत्रण नाही उलट द्रुतगती मार्गावरील ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचा अहवाल देत सुरक्षा यंत्रणांनी हात वर केले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे, याच्या खोलात कोणी जात नसल्याने १५ वर्षांनंतर आज हा मार्ग खरेच सुरक्षित आहे का, यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी ही वायर लावण्यात आली असली, तरी अजून अनेक ठिकाणे ही धोकादायक असून, तेथे ही वायर लावण्यात आलेली नाही. मार्गावर कोठेही पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. मावळ परिसरातून हा मार्ग गेला आहे, मार्गालगतच्या गावांना साधा सर्व्हिस रोडदेखील १५ वर्षांत देण्यात न आल्याने मार्गालगतच्या गावातील नागरिक जीव धोक्यात घालत सर्रासपणे दुचाकी वाहने घेऊन या मार्गावर येत आहेत याला नेमके जबाबदार कोण असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक आवाहन करत हे अपघात रोखण्यासाठी काही तर कर बाबा असे सांगितले. या आव्हानाला तरी महाराष्ट्र शासन प्रतिसाद देऊन या मार्गावरील रखडलेल्या सुविधा पूर्ण करत एक्सप्रेस वेच्या सुरक्षित प्रवासाला कटिबद्ध राहून सुरक्षा उपाययोजना करणार का? हा मृत्यूचा खेळ थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासन काय पावले उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)