शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

माऊलींच्या चलपादुकांचे आज वैभवी प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९१ व्या सोहळ्याचे शुक्रवारी (दि.२) सायंकाळी चारच्या सुमारास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीच्या १९१ व्या सोहळ्याचे शुक्रवारी (दि.२) सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान होणार आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या चांदीच्या चलपादुका मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहेत. तत्पूर्वी माऊलींचे मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण केले असून प्रस्थान संबंधित वारकऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.

माऊलींच्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शुक्रवारी (दि.२) पहाटे चार ते साडेपाच वाजता माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व आरती होईल. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविला जाईल. नंतर दुपारी चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात होईल. मोजक्या ब्रह्मवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख केला जाईल. त्यानंतर माऊलींची व गुरू हैबतबाबांची आरती होईल.

देवस्थानच्या विश्वस्तांकडून माऊलींच्या पादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात देऊन मुख्य मंदिरातून चलपादुकांचे प्रस्थान होईल. वीणा मंडपातून पादूका बाहेर आणल्यानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात मंदिर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने पादुका लगतच्याच आजोळघरात फुलांनी सजविलेल्या आसनावर विराजमान केल्या जातील. आजोळघरातच माऊलींचा सतरा दिवस मुक्काम असणार आहेत. याठिकाणी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दैनंदिन कीर्तन आणि जागरचा कार्यक्रम होईल.

राज्य सरकार आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला (१९ जुलै) माऊलींच्या चलपादुका लालपरीतून पंढरपुरीला विठूरायाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत. दरम्यान अलंकापुरीत संचारबंदी लागू असल्याने समाधी मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यास परवानगीशिवाय कोणीही येऊ नये, असे आवाहन आळंदी सोहळा प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.

चौकट :

माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला संबंधित परंपरेने आवश्यक असे मोजकेच मानकरी, सेवेकरी तसेच सोहळ्यासाठी नोंदविलेल्या प्रत्येक दिंडीतील एक याप्रमाणे एकूण साडेतीनशे वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तसा दुरुस्तीचा आदेश दरम्यान मंदिरात प्रवेश करणाऱ्यापूर्वी संबंधितांना थर्मल स्कॅन व सॅनिटाईज करून मास्क लावल्यानंतर त्यांना मंदिरात घेतले जाईल.

फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध फुलांनी मंदिर सजावटीचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात एरवी भाविकांच्या गर्दीने फुलून निघणारा पवित्र इंद्रायणी घाट भाविकांविना सुनासुना झाला आहे. (छाया : भानुदास पऱ्हाड)