शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

थेट लढतींत होणार उमेदवारांची दमछाक

By admin | Updated: February 17, 2017 04:23 IST

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीला आता पाच दिवस बाकी राहिले असताना सर्वच पक्षांमधील उमेदवारांची

राजगुरुनगर : जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीला आता पाच दिवस बाकी राहिले असताना सर्वच पक्षांमधील उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्याची धावपळ सुरु आहे. त्यामध्ये ज्या गट व गणांमध्ये सरळ लढती आहेत तेथील उमेदवारांना विजयासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत. विजयासाठी होणाऱ्या मतदानापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागणार असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे.खेड तालुक्यामध्ये एका गटामध्ये तर तीन गणांमध्ये सरळ लढती आहेत. त्यामध्ये रेटवडी-पिंपळगावतर्फे खेड या गटामध्ये तर पिंपळगावतर्फे खेड, काळूस आणि नाणेकरवाडी या गणांमध्ये सरळ लढती आहेत. प्रत्येक गटाची मतदारसंख्या ४० हजार ते २१ हजाराच्या दरम्यान आहे. सर्वात कमी नाणेकरवाडी-महाळुंगे गटामध्ये २१४५४ मतदार आहेत. येथे चौरंगी लढत असून विजयी उमेदवारासाठी झालेल्या मतदानामध्ये तीस-ते चाळीस टक्के मतेही विजयासाठी पुरेशी आहेत. मात्र दुरंगी लढत असलेल्या रेटवडी-पिंपळगाव तर्फे खेड या गटामध्ये सर्वात जास्त ४१,१८२ मतदार आहेत. येथे सरासरी सत्तर टक्के मतदान (२९ ते ३० हजार) जरी झाले तरी विजयासाठी उमेदवाराला कमीतकमी १५ ते १६ हजार मते मिळवावी लागणार आहेत. तेच नाणेकरवाडी-महाळुंगे गटामध्ये ८० टक्के (१६ ते १७ हजार) मतदान झाले तरी तेथे चौरंगी लढतीमुळे विजयासाठी आठ हजार मतेही पुरेशी ठरु शकतात. त्या खालोखाल सांडभोरवाडी-काळूस गणामध्ये ३९,८१८ मतदार आहेत. येथेही तिरंगी लढत असली तरी दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये कडवी लढत आहे. त्यामुळे येथेही विजयी उमेदवाराला झालेल्या मतदानाच्या ४५-५० टक्के मतदान घ्यावे लागणार आहे.