शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

जनावरांना विकण्याची वेळ

By admin | Updated: June 2, 2016 00:36 IST

जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना अखेर बाजार दाखविण्याची वेळ आली आहे. उपाशी जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे

काऱ्हाटी : जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना अखेर बाजार दाखविण्याची वेळ आली आहे. उपाशी जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगविण्यासाठी आता तरी चारा डेपो सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या, अजूनही दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई भासत असल्याने शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहे. परिसरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांबरोबरच जनावरांनाही मोठ्या प्रमाणात दुष्काळाची झळ बसली आहे. विहिरी, बोअरवेल पाणीसाठा अल्प प्रमाणात असल्याने दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळाने शेतकऱ्याचे सगळीक डून आर्थिक नियोजन पूर्ण ढासळले आहे. पिण्यास पाणी नाही. शेती ओस पडली आहे, तर जनावरांना चारा नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. साठवलेला चारा संपला आहे. चारा विकत घेऊन पाच महिने जनावरांना जगवले. मात्र, आता पैसा जवळ नाही. त्यामुळे शेतकरी जिवापाड सांभाळलेली जनावरे मातीमोल बाजारभावाने बाजारात विकत आहेत. दरम्यान, एक लाख रुपये किमतीची गाय आज पस्तीस हजार रुपयांनी विकण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली असल्याचे फोंडवाडा (लोणी)चे संजय पिसाळ व लालासोा भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)स्वच्छतागृह वापराविना पडूनपिंपळी : गुणवडी येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वच्छतागृह वापराविना पडून आहेत. ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केलेली आहे; परंतु या ठिकाणी पाण्याची सोय नाही.शिवाय मैलापाणी जाण्यासाठी तशी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अनेक स्वच्छतागृह वापराविना पडून आहेत. अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे मोडून पडलेले आहेत. अनेक ठिकाणी दरवाजे नाहीत. या गावामध्ये अनेक कुटुंबांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा नाही. आर्थिक अडचणींमुळे स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे. (वार्ताहर)