शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

औंध जिल्हा रुग्णालयात तीन वर्षांत तीन हजार बाळांचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:12 IST

पुणे : अलीकडच्या काही वर्षात लठ्ठ मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. गर्भवती महिलांमधील आहाराचे अतिरिक्त प्रमाण, मधुमेहासारखे विकार ...

पुणे : अलीकडच्या काही वर्षात लठ्ठ मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. गर्भवती महिलांमधील आहाराचे अतिरिक्त प्रमाण, मधुमेहासारखे विकार याची परिणती जन्मजात अर्भकाच्या लठ्ठपणामध्ये होते. साधारण चार किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यास ते लठ्ठ समजले जाते. औंध जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षांमध्ये केवळ एकाच बाळाचे वजन ४ किलोपेक्षा जास्त असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लठ्ठ मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

औंध जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वसाधारण वजनाची बाळे जन्माला आली आहेत. मागील तीन वर्षांमध्ये रुग्णालयात २९४९ बाळांचा जन्म झाला. त्यापैकी २०२० मध्ये केवळ एका बाळाचे वजन ४ किलोपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. गर्भावस्थेदरम्यान वेळच्या वेळी सर्व तपासण्या केल्यास, मधुमेहाचे निदान झाल्यास त्यावेळी योग्य उपचार केल्यास प्रसूतीच्या दृष्टीने सर्व खबरदारी आधीपासून घेता येते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलांना वेळच्या वेळी तपासण्या, पोषण आहार यांचे महत्व समजावून सांगितले जाते. बाळाचे वजन सरासरीपेक्षा जास्त किंवा कमी भरल्यास माता आणि बाळाला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाते.

-----------------

जिल्हा रुग्णालयात २०१८ मध्ये जन्मलेली एकूण मुले - १०३८

मुले - ५६५

मुली - ४७३

चार किलोंपेक्षा जास्त वजनाची एकूण मुले - ०

------------------

जिल्हा रुग्णालयात २०१९ मध्ये जन्मलेली एकूण मुले - ९२१

मुले - ५०३

मुली - ४१८

चार किलोंपेक्षा जास्त वजनाची एकूण मुले - ०

----------------

जिल्हा रुग्णालयात २०२० मध्ये जन्मलेली एकूण मुले - ९९०

मुलगा - ५१३

मुलगी - ४७७

चार किलोंपेक्षा जास्त वजनाची एकूण मुले - १

-------------------

३) शहरी मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे मत बालरोगतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. महिलांमधील अतिरिक्त आहार, बदलती जीवनशैली, मधुमेहासारखे विकार यामुळे जन्मजात अर्भकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढते. गर्भधारणेच्या काळात जास्त आहार घेतल्यासही बाळांचे वजन वाढू शकते.

-----------------------

बाळांमधील लठ्ठपणाची कारणे :

- स्थूल माता

- मधुमेहासारखे विकार

- प्रसूती नऊ दिवस नऊ महिन्यांच्या पुढे जाणे

- गर्भधारणेच्या दरम्यान जास्त वजन वाढणे

------------------------

ग्रामीण भागात गर्भवती महिलांच्या पोषण आहाराबाबत पुरेशी जागरुकता पहायला मिळत नाही. त्यामुळे बाळांमध्ये लठ्ठपणाचे कमी प्रमाण पाहायला मिळते. गर्भावस्थेदरम्यान विविध तपासण्या नियमितपणे करण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळी अर्भकाच्या वजनाचाही अंदाज येतो. स्थूल महिलांमध्ये मधुमेह आढळून आला किंवा गर्भावस्थेमध्ये मधुमेहाचे निदान झाले, प्रसूतीचे दिवस उलटून गेले किंवा गर्भावस्थेत जास्त वजन वाढले तर जन्मजात बाळामध्ये लठ्ठपणा पाहायला मिळतो.

- डॉ. नीलम दीक्षित, प्रसूती विभाग प्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय