शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच शेतकऱ्याच्या जागेवर तीन-तीन आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणने (पीएमआरडीए) प्रसिद्ध केलेल्या प्रारूप आराखड्यात एकाच शेतकऱ्याच्या ...

अभिजित कोळपे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणने (पीएमआरडीए) प्रसिद्ध केलेल्या प्रारूप आराखड्यात एकाच शेतकऱ्याच्या जागेत दोन आरक्षण टाकले आहेत. तसेच पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी देखील याच शेतकऱ्याच्या जागेत आरक्षण टाकले आहे. आधीच अल्पभूधारक असल्याने नव्याने तीन आरक्षण पडल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाला आहे.

पीएमआरडीएने २ ऑगस्ट रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, या आराखड्यात चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रत्येक गावागावांत अशाच पद्धतीने आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाला आहे. तसेच टाकलेले आरक्षण काढण्यासाठी या शेतकऱ्यांना पीएमआरडीएच्या कार्यालयामध्ये मात्र हेलपाटे मारावे लागणार आहेत.

लोणीकंद येथील एक अल्पभूधारक शेतकरी उमेश लोखंडे यांच्या शेतात तीन-तीन आरक्षण टाकली आहेत. त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. गट नंबर ५०९ येथे त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जागेतील पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी आधीच ३५ गुंठे जागा आरक्षित केली आहेत. आता पीएमआरडीएने प्रारूप विकास आराखड्यात २४ मीटर रस्त्यासाठी २२ गुंठे जागेवर तर, क्रीडांगणासाठी आणखी १३ गुंठे आरक्षण टाकले आहे. अल्पभूधारक असलेल्या उमेश लोखंडे यांच्याकडे या तीन आरक्षणामुळे आता काही गुंठेच जागा शिल्लक राहत आहे. त्यांच्या घरात कोणीच कामाला नाही. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या गट नंबर शेजारी शासनाच्या मालकीची गायरान जमीन आहे. मात्र, तेथून हे मार्ग प्रस्तावित न करता त्यांच्या क्षेत्रातून तीन आरक्षण टाकले आहेत. त्याबदल्यात किती मोबदला मिळणार हे शासकीय पातळीवर अद्याप स्पष्ट केले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.

-------

कोट

राज्य शासन आणि केंद्र शासनाने आरक्षण टाकताना शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचा चंग बांधला आहे का, असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित होत आहे. एकाच शेतकऱ्याच्या जमिनीवर तीन-तीन आरक्षण कसे काय टाकू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा उपक्रम आहे का? याबद्दल संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे.

- उमेश लोखंडे, बाधित शेतकरी

-------

कोट

सांगरूण येथेही पीएमआरडीएने अशाच पद्धतीने चुकीचे आरक्षण टाकले आहे. गेली ७०-८० वर्षे ज्या जागेवर माळरान (नापीक) आहे. तेथे शेती झोन टाकला आहे. तर जी बागायती शेती आहे. शेतकरी ती कसत आहेत, तेथे निवासी झोन टाकला आहे. पीएमआरडीएने अशा पद्धतीने आराखडा बनवताना संबंधित भागाची माहिती घेतली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- अनिल हेंद्रे, बाधित शेतकरी