शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

अध्यक्षपदाचे काय ते तीन पक्षप्रमुख ठरवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोणीही राजीनामा दिला की त्यावरून सरकार अस्थिर झाल्याच्या वावड्या उठतात. पद रिक्त झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “कोणीही राजीनामा दिला की त्यावरून सरकार अस्थिर झाल्याच्या वावड्या उठतात. पद रिक्त झाले आहे. त्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून काय ते ठरवतील,” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीच री ओढली.

“अधिवेशन तोंडावर आलेले असताना पटोले यांचा राजीनामा यायला नको होता. अधिवेशन झाल्यावर दिला असता तरी चालले असते असे,” असेही पवार म्हणाले. शुक्रवारी (दि.५) एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.

मुख्यमंत्री नाराज, उपमुख्यमंत्री नाराज, सरकार अस्थिर या सर्व वावड्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सरकार स्थापनेच्या वेळीच मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असे ठरले होते, त्यात बदल व्हायचे काही कारण नाही. आघाडीत तीन पक्ष आहेत, त्यांचे प्रमुख एकत्र बसून सगळे ठरवतात, किमान समान कार्यक्रमावर सरकार चालले आहे.

“भारतीय जनता पार्टीकडे आता भांडायला काहीच मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे वाढीव वीज बिल, इंधनाचे दर असे काहीतरी काढून ते ओरडत असतात. इंधनाचे दर कोणावर अवलंबून आहे ते जनतेला चांगले माहिती आहे. वाढीव वीज बिलांबाबत सरकार तोडगा काढते आहे, त्यामुळे त्यांनी चिंता करायचे कारण नाही,” असे पवार म्हणाले. महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये असा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

तिथेच खुलासा झाला असता तर...

“एल्गार परिषदेतल्या भाषणात ‘ते’ विधान यायला नको होते. सरकार योग्य कायदेशीर कारवाई करेलच. या देशात, राज्यात सगळे समाज, सगळे धर्म गुण्यागोविंदाने राहातात. कोणीही कोणाचा द्वेष किंवा अवमानास्पद बोलणे करायला नको. न्यायाधीश म्हणून काम केलेली व्यक्ती व्यासपीठावर असताना तरी ते वक्तव्य नको होते, त्यांनी तिथेच त्याचा खुलासा केला असता तर चांगले झाले असते.” - अजित पवार