शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाचे काय ते तीन पक्षप्रमुख ठरवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोणीही राजीनामा दिला की त्यावरून सरकार अस्थिर झाल्याच्या वावड्या उठतात. पद रिक्त झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “कोणीही राजीनामा दिला की त्यावरून सरकार अस्थिर झाल्याच्या वावड्या उठतात. पद रिक्त झाले आहे. त्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून काय ते ठरवतील,” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीच री ओढली.

“अधिवेशन तोंडावर आलेले असताना पटोले यांचा राजीनामा यायला नको होता. अधिवेशन झाल्यावर दिला असता तरी चालले असते असे,” असेही पवार म्हणाले. शुक्रवारी (दि.५) एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.

मुख्यमंत्री नाराज, उपमुख्यमंत्री नाराज, सरकार अस्थिर या सर्व वावड्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सरकार स्थापनेच्या वेळीच मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असे ठरले होते, त्यात बदल व्हायचे काही कारण नाही. आघाडीत तीन पक्ष आहेत, त्यांचे प्रमुख एकत्र बसून सगळे ठरवतात, किमान समान कार्यक्रमावर सरकार चालले आहे.

“भारतीय जनता पार्टीकडे आता भांडायला काहीच मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे वाढीव वीज बिल, इंधनाचे दर असे काहीतरी काढून ते ओरडत असतात. इंधनाचे दर कोणावर अवलंबून आहे ते जनतेला चांगले माहिती आहे. वाढीव वीज बिलांबाबत सरकार तोडगा काढते आहे, त्यामुळे त्यांनी चिंता करायचे कारण नाही,” असे पवार म्हणाले. महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये असा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

तिथेच खुलासा झाला असता तर...

“एल्गार परिषदेतल्या भाषणात ‘ते’ विधान यायला नको होते. सरकार योग्य कायदेशीर कारवाई करेलच. या देशात, राज्यात सगळे समाज, सगळे धर्म गुण्यागोविंदाने राहातात. कोणीही कोणाचा द्वेष किंवा अवमानास्पद बोलणे करायला नको. न्यायाधीश म्हणून काम केलेली व्यक्ती व्यासपीठावर असताना तरी ते वक्तव्य नको होते, त्यांनी तिथेच त्याचा खुलासा केला असता तर चांगले झाले असते.” - अजित पवार